दादर कबुतरखाना वाद : कबुतरखाना बंद करण्याविरुद्ध जैन संतांचा निषेध  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  मुंबईतील दादर कबुतरखाना  बंद करण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही सुरू आहे. जैन संत नीलेशचंद्र विजय यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बीएमसीच्या कबुतरखाना  बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध निदर्शने सुरू केली आहेत. जैन समुदायाचे सदस्य पारंपारिकपणे दादर कबुतरखाना मध्ये कबुतरांना खायला घालतात. तथापि, स्थानिक निषेध आणि कबुतरांमुळे पसरणाऱ्या आजारांबद्दलच्या चिंतेमुळे, बीएमसीने अलीकडेच कबुतरखाना  बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 
				  													
						
																							
									  				  				  
	जैन संत नीलेशचंद्र विजय यांनी सोमवारी दक्षिण मुंबईतील बीएमसी मुख्यालयाजवळ बीएमसीच्या निर्णयाविरुद्ध निदर्शने सुरू केली आणि जर बीएमसीने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्यांचे निदर्शन अनिश्चित काळासाठी सुरू राहील असे संकेत दिले. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  				  																								
											
									  
	बीएमसीने अलीकडेच मुंबईतील चार ठिकाणी कबुतरांना खायला घालण्यासाठी नियंत्रित परवानगी दिली आहे. यामध्ये वरळी जलाशय, अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला खारफुटी क्षेत्र, ऐरोली-मुलुंड चेकपोस्ट क्षेत्र आणि बोरिवली पश्चिमेतील गोराई ग्राउंड परिसर यांचा समावेश आहे. बीएमसीने सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना खायला घालण्याची परवानगी दिली आहे. तज्ञ समिती आपला अहवाल सादर करेपर्यंत आणि न्यायालयाचा आदेश जारी होईपर्यंत ही व्यवस्था तात्पुरती राहील असेही बीएमसीने म्हटले आहे.
				  																	
									  				  																	
									  
	जैन संत म्हणाले, "मंजूर केलेली जागा दादर कबुतरखान्यापासून चार ते पाच आणि सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर आहे. कबुतर इतके दूर उडतील का? नवीन जागा सध्याच्या कबुतरखान्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असावी." जैन संताने धमकी दिली की जर आझाद मैदानावर निषेध करण्याची परवानगी दिली नाही तर ते दादर कबुतरखान्याच्या जागेवर निषेध करतील. 
				  																	
									  
	 
	या परिसरातील स्थानिक प्रशासन कबुतरखानाला विरोध करत आहे.  स्थानिकांचे म्हणणे आहे की त्यांना कबुतरांच्या विष्ठेची आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या आजारांची भीती आहे. बीएमसीच्या कबुतरखाना बंद करण्याचा निर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिकांनी केले मात्र याला जैन समुदायाचा विरोध आहे.  
				  																	
									  
	Edited By - Priya Dixit