1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By नवीन रांगियाल|
Last Updated : शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:08 IST)

'मारुती'च्या नावाने गदारोळ, 'मैं झुकेगा नहीं'...

navneet rana uddhav Thackeray
मारुतीच्या नावावार गदरोळ करुन उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा यांनी स्वत:वरच ‘पॉलिटिकल सटायर’केलं आहे. शिवसेना आणि नवनीत राणा यांच्यात मुंबईत जे काही सुरू आहे ते देशभरात एकोपा होण्याचे सकारात्मक उदाहरण ठरू शकले असते, पण उलट त्याचे परिणाम बजरंग बळीच्या नावाने गदारोळाच्या रूपात समोर येत आहेत.
 
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे सांगितले होते. कोणीतरी आमच्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा पठण करावे ही चांगली गोष्ट नव्हती का? मात्र प्रत्युत्तर म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा निर्णय घेतला.
 
या अर्थाने नवनीत राणाच्या श्रद्धेचे माध्यम मानणाऱ्या हनुमान चालीसाचे पठण त्यांच्या घरासमोर होणे ही देखील भाग्याची गोष्ट होती. पण आश्चर्य म्हणजे दोन्ही पक्षांना एकमेकांच्या घरी जाऊन हा पवित्र पाठ करायचा आहे आणि हे काम त्यांच्या घरासमोर होऊ नये अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे.
 
जेव्हा दोन्ही बाजूंना हनुमानजींचे स्मरण करायचे असते, तेव्हा यापेक्षा चांगले काय असू शकते. त्यामुळे नवनीत राणा जेव्हा 'मातोश्री'समोर चालीसा म्हणायला गेल्या तेव्हा ठाकरे सरकारने त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तंबू ठोकून सावली देत चहा-नाश्त्याची व्यवस्था केली असते तर.
 
तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा करण्यासाठी राणा यांच्या घरी पोहोचले असता, अमरावतीच्या कडक उन्हात राणांनी त्यांच्या स्वागतासाठी उसाच्या रसाची व्यवस्था केली असते.
 
दोन्ही बाजूंना हनुमान चालीसा करायची आहे आणि ती त्यांच्या घरासमोर होऊ देण्यास दोघांचा विरोध आहे. ही केवळ एक अतिशय मनोरंजक घटना नाही तर राजकीयदृष्ट्या 'हास्यास्पद' घटना आहे. ज्याला 'राजकीय चूक'ही म्हणता येईल. नेत्यांनी स्वतःवरच ओढवलेला राजकीय 'व्यंग'.
 
'राजकीय संधी' चा फायदा न करून घेण्याची चूक. दोघांनी ही चूक केली. शिवसेनाही आणि नवनीत राणाही. 
नवनीत राणा यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात थोडी खळबळ उडाली असली, तरी महाराष्ट्रातील हिंदूंचे कौतुक करण्यात उद्धव ठाकरे चुकले. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करून त्यांना त्यांच्या घरासमोर बसवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी आनंदाने स्वीकारला असता तर मुंबईतील हिंदू त्यांच्यासोबत खूष झाले असते.
 
पण अनेकवेळा अभिमानाच्या लढाईत नेते आपले राजकीय नुकसान करतात, उद्धव ठाकरेंनीही तेच केले आणि या अभिमानामुळे नवनीत राणा यांनी ही प्रसंग‘कंस्‍ट्रक्‍टिव्ह’ करण्याची संधीही गमावली. तसे केले असते तर त्यांचा दर्जा वाढला असता.
 
नवनीत राणा यांचे समर्थक 'मातोश्री'समोर हनुमान चालीसाचे पठण करताना शिवसेनिक त्यांच्यासोबत मंजिरे वाजवत आहे असं दृश्य देशातील वृत्तवाहिन्यांवर झळकले असते तर किती बरे झाले असते, त्याचवेळी नवनीत राणाच्या घरासमोर शिवसेनिकांना हनुमानजींची आराधना करत असताना राणाचे समर्थक त्यांच्या सुरात सामील झाले असते. पण देशाचे राजकारण असे दृश्य पाहण्याची संधी देत ​​नाही किंवा चुकते हे दुर्दैव आहे. हे राजकारणाचे आणि देशाचे दुर्दैव आहे.