नालंदा : शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू; पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची घोषणा
बिहारमधील नालंदामधून एका भीषण दुर्घटनेची बातमी आली. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा राष्ट्रपतींच्या नालंदा दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असतानाच, जिल्ह्यातील शीतला देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय मदत निधीतून नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. राज्य सरकारनेही आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी बिहार शरीफमधील माघरा येथील माता शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 8 महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. अचानक एक अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. नालंदा पोलिसांच्या एका पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील शीतला देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला. ही घटना अत्यंत दुःखद आणि अत्यंत क्लेशदायक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी ६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिले आहे.
Edited By- Dhanashri Naik