Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेरोजगार राहणपेक्षा भजी विकणे चांगले : अमित शहा

Updated: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (11:38 IST)
 
शहा यांचे राज्यसभेतील खासदार म्हणून हे पहिले भाषण होते. पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत नरेंद्र मोदी सरकारच्या कामाचा मुक्तकंठाने गौरव केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते. आम्ही सरकारध्ये आलो तेव्हा खूप काम करावे लागले. मागच्या सरकारने निर्माण केलेले खड्डे बुजविण्यात आमचा बराचसा वेळ गेला. त्यामुळे आमचे विश्र्लेषण करताना वेगळ्या दृष्टीने केले पाहिजे, असे शहा यांनी सांगितले. 2013 मधील देशाची स्थिती आठवा. तेव्हा देशाच्या विकासाची गती थांबली होती. देशात महिला सुरक्षित नव्हत्या. देशाचे संरक्षण करणारे जवानही सरकारच्या निर्णय न घेण्याच्या धोरणामुळे काहीच करू शकत नव्हते, अशी टीका शहा यांनी केली.
 
30 वर्षांत सत्तेत पूर्ण बहुमत असलेली गैरकाँग्रेसी सरकारे खूप कमी आली. आमच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. तरीही आम्ही रालोआ सरकार स्थापन केले. जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सरकार गरिबांचे सरकार असेल, हे सरकार महात्मा गांधी आणि दीनदयाळ यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले होते, असेही शहा म्हणाले.
 
यावेळी शहा यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. जनधन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा जे 60 वर्षांत झाले नाही, ते आता कसे होईल, या विचाराने मीही साशंक होतो. पण आज 31 कोटी लोकांचे बँकेत खाते आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments