1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (10:54 IST)

भाजप अनेक पाकिस्तान बनवू इच्छित आहे- मेहबूबा मुफ्ती

काँग्रेसने हिंदू आणि मुसलमानांना सांभाळून ठेवले. देशाला तोडले नाही. हे लोक देश तोडू इच्छित आहेत. जिन्ना यांनी एक पाकिस्तान बनवला, तर हे अनेक पाकिस्तान बनवू इच्छित असल्याचे आरोप पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर केलेत.
 
त्या जम्मू-काश्मीरमधील सांबा येथे मंगळवारी (22 मार्च) बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "त्यांना वाटतं की आमचं भांडण पाकिस्तानबरोबर चालू राहावं. हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम करत राहावं, जिन्ना-जिन्ना करत राहावं. आता तर जिन्नांना सोडून ते बाबरची आठवण काढतात. औरंगजेबचीही आठवण काढत आहेत. अरे, औरंगजेब 500 ते 600 वर्षांपूर्वी होऊन गेला. आमचा त्यांच्याबरोबर काय संबंध?"
"तुम्ही त्यांची आठवण का काढता? तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी रस्ते नाहीत का? पाणी नाही का? वीज नाही का? आम्ही पूर्ण देशाला वीज पुरवतो. मात्र आमच्या शेतात पाणी देण्यासाठी वीज नसते. आमच्या कॅनॉलमध्ये पाणी नसते," या शब्दांमध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
 
काँग्रेसविषयी त्या म्हणाल्या, " आता निवडणुका नाहीत. मी तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी आलेली नाही. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे, की काँग्रेस पक्षाने पन्नास वर्षे भले चुकीचे कामे केले असतील. मी म्हणत नाही की त्यांनी सर्व बरोबर केले. पण त्यांनी या देशाला सुरक्षित ठेवले. हिंदू, मुसलमानांना सांभाळून ठेवले. देशाला तोडले नाही. हे लोक देश तोडू इच्छित आहेत. जिना यांनी एक पाकिस्तान बनवला, तर हे अनेक पाकिस्तान बनवू इच्छित आहेत" असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर यावेळी केला.