टायर फुटल्याने कार उलटली, तीन विद्यार्थिनींचा मृत्यू
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात झालेल्या एका घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी महाराजगंज जिल्ह्यातील सिकंदरजितपूर येथील धानी-फरेंडा रस्त्यावर टायर फुटल्याने कार उलटल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्ह्यातील फरेंडा पोलीस स्टेशन हद्दीतील सिकंदरजितपूर येथील धानी-फरेंडा रोडजवळ त्यांच्या गाडीचा टायर अचानक फुटला आणि गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या घटनेत चालक आणि इतर ११ विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्या सर्वांना धानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik