1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (23:16 IST)

ट्विटर वर कमेंट करून काही होणार नाही, आधी काहीतरी करा; सीतारामन यांचा राहुलवर हल्लाबोल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे म्हटले होते. आता राहुल गांधींच्या प्रतिक्रियांवर अर्थमंत्र्यांनी आपलं मत मांडलं आहे. राहुल गांधींची खिल्ली उडवत अर्थमंत्री म्हणाले की , ट्विटरवर कमेंट करून काहीही होत नाही , त्यांनी आधी काहीतरी केले पाहिजे. अर्थमंत्री म्हणाल्या, 'मला त्या लोकांची कीव येते जे खूप लवकर प्रतिक्रिया देतात. आपल्याला ट्विटरवर काहीतरी टिप्पणी करायची आहे असं करणे आपल्या काहीच कामी येणार नाही. त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे.
 
पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोटे व्यापारी यांच्यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पात काहीच नाही, असे राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हटले होते. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले होते की, 'मोदी सरकारच्या बजेटमध्ये काहीही नाही. मध्यमवर्गीय, पगारदार वर्ग, गरीब आणि वंचित वर्ग, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीही नाही. 
 
पत्रकार परिषदेत जेव्हा अर्थमंत्र्यांना राहुल गांधींच्या टिप्पणीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गृहपाठ न करता अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. त्यांनी प्रथम त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांची काळजी घ्यावी. केंद्राने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या त्यांनी राबवाव्यात. त्यांनी पंजाब, महाराष्ट्र आणि छत्तीसगडकडे लक्ष द्यावे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, सरकारने देशातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गीयांना दिलासा न देऊन ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला.