गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2026 (16:59 IST)

नितीश कुमार मुख्यमंत्री पद सोडणार?

नितीश कुमार
जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. बिहारच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असून, त्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. नितीश कुमार यांच्या जाण्यानंतर बिहारची सूत्रे कोण घेईल, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
 
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. नितीश कुमार स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करतील की त्यांना इतर कोणी मदत करेल यावर भाजप आणि जेडीयू दोन्ही पक्षांचे नेते उघडपणे बोलण्याचे टाळत आहे. राज्यसभेच्या निवडणुका १६ मार्च रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होतील.
 
तथापि, माध्यमांच्या वृत्तानुसार, नितीश कुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. जर नितीश कुमार केंद्रीय राजकारणात प्रवेश करतात तर राज्याची सूत्रे त्यांच्या पसंतीच्या नेत्याकडे सोपवता येतील, असे वृत्त आहे.
 
असे वृत्त आहे की राज्याचा नवा मुख्यमंत्री भाजपचा असू शकतो. सम्राट चौधरी, नित्यानंद राय आणि डॉ. दिलीप जयस्वाल यांची नावे या पदासाठी प्रमुख दावेदार आहे. हे तिघेही बिहार भाजपमधील प्रमुख व्यक्ती आहे.
 
नीतीश कुमार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या बातमीने जेडीयूचे अनेक नेते खूप नाराज आहे. जेडीयू नेते राजीव रंजन पटेल आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. ते म्हणाले, "आम्हाला कोणत्याही परिस्थितीत नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री हवे आहे."
तथापि, जर नितीश कुमार राज्यसभेत गेले तर बिहारमधील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलेल. एनडीएने २०२५ ची बिहार निवडणूक नितीश कुमार यांच्या नावाने लढवली. आता राज्यातील सत्ता समीकरण कसे बदलते आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
Edited By- Dhanashri Naik