रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : गुरूवार, 25 जुलै 2024 (12:45 IST)

पुणे : 2 मुलांची आई, ऑनलाइन लग्न करून भारतातून पोहचली पाकिस्तानात

सीमा हैदर पार्ट टू: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारावर एक महिला पाकिस्तानमध्ये जाण्याचे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने आपले खरे नाव बदलवले व बनावट कागदपत्रांच्या आधारावर पाकिस्तानातील रावलपिंडी येथे गेल्याचा तिच्यावर आरोप आहे.
 
पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारावर एक महिला पाकिस्तानमध्ये जाण्याचे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने आपले खरे नाव बदलवले व बनावट कागदपत्रांच्या आधारावर पाकिस्तानातील रावलपिंडी येथे गेल्याचा तिच्यावर आरोप आहे. मिळलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन दरम्यान वर्ष 2021 मध्ये नगमा उर्फ सनम खान फेसबुक वर बशीर नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली. बशीर हा पाकिस्तानच्या रावलपिंडी मधील रहिवासी आहे आणि एका हॉटेलमध्ये काम करतो. दोघांमध्ये फेसबुक वरून ओळख झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
 
व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहित असलेली दोन मुलांची आई या महिलेला पाकिस्तानात जाण्यासाठी विजा गरजेचा होता. या महिलेले बनावट कागदपत्रं बनवून त्याव्दारे पाकिस्तानात पोहचली. त्यानंतर आपल्या आईची तब्येत विचारण्यासाठी सनम 17 जुलै ला मुंबई परतली. तेव्हा पोलिसांनी तिच्या विरुद्ध केस नोंदवून चौकशी सुरु केली. 
 
डीसीपी अमर जाधव यांनी सांगितले की, या महिलेच्या कागदपत्रांची चौकशी सुरु आहे. याबद्दल तिची चौकशी सुरु आहे. जर ती दोषी असेल तर तिच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल.