पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
पुण्यात एका पती, पत्नी आणि त्यांच्या १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विनोद पिल्लई(५०)पत्नी श्रीजा पिल्लई (४५) आणि मुलगी पूर्णिमा पिल्लई असे मयतांची नावे आहेत. रविवारी डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मोरवाडी येथे घडली. हे कुटुंब मूळचे केरळचे असून गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी परिसरात राहत होते. एक आत्महत्येची चिठ्ठी सापडली असून, त्यात आर्थिक अडचणींचा उल्लेख आहे. तसेच, आपल्या कृत्यासाठी कोणालाही दोष देऊ नये, असेही त्या चिठ्ठीत म्हटले आहे."
पोलिसांनी सांगितले की, मोरवाडी येथील एका शाळेत समन्वयक म्हणून काम करणाऱ्या श्रीजाने, तिच्या कामावरील अनुपस्थितीबद्दल विचारणा करणाऱ्या सहकाऱ्यांच्या फोनला प्रतिसाद न दिल्याने ही घटना उघडकीस आली.
त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला, त्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. जवळ राहणारे काही नातेवाईक पिल्लईंच्या घरी गेले असता त्यांना दरवाजा उघडा आढळला. आतमध्ये ते तिघे बेशुद्ध अवस्थेत आढळले, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली," असे अधिकाऱ्याने सांगितले.जोडप्याला आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे शनिवारी विनोद यांचा मृत्यू झाला, तर श्रीजा आणि पूर्णिमा यांचा रविवारी मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक अडचण हे आत्महत्येमागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.
Edited By - Priya Dixit
