गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (12:01 IST)

लातूर भूकंपाची 29 वर्षे: लातूरमध्ये भूकंपात हजारो लोकांचे प्राण गेले

30 सप्टेंबर 1993 रोजी महाराष्ट्रातील लातूर येथे मोठा भूकंप झाला तेव्हा हजारो लोक मृत्युमुखी झाले 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे 3.56 वाजता महाराष्ट्रातील मराठवाडा भाग भूकंपाने हादरला होता. एक दिवस आधी अनंत चतुर्दशी होती. गणपती विसर्जन करून लोक थकून झोपले की त्यांना उठायला वेळच मिळाला नाही. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांमध्ये 10,000 लोक मारले गेले. हजारो जखमी झाले.

सर्व काही उद्ध्वस्त झाले. लातूरमध्ये पहाटे भूकंप झाला, त्यावेळी लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे जीवित व मालमत्तेचे अधिक नुकसान झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी येथे असल्याचे मानले जाते. 
 
लातूरच्या औसा भाग आणि उस्मानाबादचा उमरगा या भागांत सर्वाधिक फटका बसला. या भूकंपात 52 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. रिश्टर स्केलवर 6.4 रिश्टर स्केलच्या या भूकंपात सुमारे 20 हजार लोक मृत्युमुखी झाले.या भूकंपात सुमारे 30 हजार लोक जखमी झाले, 30 हजार घरे कोसळली आणि 13 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख 11 हजार घरांचे नुकसान झाले. मदत आणि बचाव कार्यादरम्यान लष्कर आणि बचाव पथकाने अनेकांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले. या नैसर्गिक आपत्तीत अपंगांना 46.55 लाख रुपयांची मदत देण्यात आली. रेडक्रॉस संस्थेने भूकंपग्रस्त भागात प्रत्येकी 27 खाटांची तीन ग्रामीण रुग्णालये तातडीने  बांधली.भूकंपात ज्यांची जनावरे मरण पावली त्यांना सरकारतर्फे जनावरे देण्यात आली. 

सरकारने जागतिक बँक आणि इतर देणगीदारांच्या मदतीने पीडितांसाठी एक मोठा पुनर्वसन कार्यक्रम राबवला. पुनर्वसनाच्या कामासाठी769 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि अनेक देशी-विदेशी देणगीदार संस्थांनी मदत आणि बचाव कार्यासाठी देणगी दिली. 

Edited By - Priya Dixit