संबंधित माहिती
- राज्य सरकारचा मोठा निर्णय : समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार
- नाशिक: गड, किल्ल्यांवर मद्यसेवनाचे गैरवर्तन केल्यास होणार कायदेशीर कारवाई
- Alwar: फोनवर सतत 15 तास गेम खेळल्याने विद्यार्थ्याचे मानसिक संतुलन बिघडले
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करण्याऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
- फॉक्सकॉनने वेदांताबरोबरचा करार का मोडला? त्याला जबाबदार कोण?
राज्यात तीन पक्षांचं सरकार, बिघाडीही होऊ शकते
A government of three parties in the state may also fail 10 दिवसानंतरही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून महायुतीच्या सरकारची गुंतागुंत वाढतच चालली आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी आज अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.
दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या सरकारच्या भवितव्याबद्दल सूचक विधान केलं आहे. राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकतं आणि बिघाडीही होऊ शकते. तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनाही सत्तेत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “सध्या थोडा खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल, असं मला वाटतं. मी याआधी म्हटल्याप्रमाणे हे सरकार तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकते आणि तीन तिघाडा म्हणून बिघाडाही होऊ शकतं. बिघाडा होऊ नये, यासाठी बैठका सुरू असतील.
