Marathi Biodata Maker

शेतकऱ्यांवरील या दडपशाहीची किंमत राज्यकर्त्यांना मोजावी लागेल - अजित पवार

मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (18:01 IST)
दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे पोलिसांकडून बळाचा वापर झाला ते सरकारचे अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते Ajit Pawarयांनी केली आहे. असले सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करते, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडते, सरकार शेतकरीविरोधात लाठीचार्ज करते. हे सरकारंच शेतकरी विरोधात आहे तर यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत नाही, कर्जमाफी नाही. एकीकडे मोठ्या उद्योगपतींना हजारो-कोटींची कर्जमाफी होते. मोठ्या बॅंकेमध्ये त्यांचे कर्ज माफ करण्याकरिता सरकार त्या ठिकाणी मोठी रक्कम देत आहे. त्यातच कोट्याधीश होणारी माणसे आपला पैसा लुबाडून परदेशात पळून जात आहेत व आपले सरकार बघ्याची भूमिका घेतंय. इथे मात्र जो शेतकरी संपूर्ण देशाला अन्न पिकवतो, धान्य पिकवतो, सगळ्यांना जगवतो. अशा या लाखाच्या पोशिंद्यावर हे लाठीचार्ज करतात. या राज्यकर्त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर छापा, लाखो रुपयांची औषधे जप्त

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

पुढील लेख
Show comments