संबंधित माहिती
- अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी का आले नाहीत?
- शहाजीराजेंच्या स्मृतीदिना निमित्त उपमुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
- ‘म्हाडा’ भ्रष्टाचारमुक्त, कोणत्याही दलालाची नेमणूक केलेली नाही : अजित पवार
- लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला देखील सांगू : अजित पवार
कर्नाटकाकडून झालेल्या मागणीला अजित पवार यांचे प्रत्युत्तर
“केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही असे कर्नाटकाकडून झालेल्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली,” असं सांगत पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.
पुढील लेख
