Marathi Biodata Maker

वेळ आहे आता होऊ द्या आर पार - अण्णा हजारे

शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (08:53 IST)
पुलवामातील जवानांवरील हा अत्यंत भ्याड हल्ला असून, हल्ल्याने संपूर्ण देशाला वेदना झाल्या आणि संताप अनावर झाला आहे. आणखी किती दिवस जवान शहीद होणार? एकदा होऊ द्या आरपार! यांना धडा शिकवलाच पाहिजे. यावर सरकारने गंभीर पणे आता विचार करावे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत व्यक्त केले आहे. अण्णा हजारे म्हणाले, एकदा होऊ द्या आरपार! अशी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच भावना असून, त्यामुळे केंद्र सरकारने सर्वांच्याच भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, आज वयोमानानुसार मला शस्त्र पेलवणार नाही. पण जर माझी गरज पडलीच तर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना सामुग्री पुरवण्याचे काम आजही करीन, अशी प्रतिक्रिया खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. देशात दहशतवादी हल्ला झाला यामुळे संतापाचे वातवरण आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: अमरावती ते पंढरपूर मार्गावर एसटी बस प्रवास महाग झाला

बलात्कार प्रकरणात दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या अटकेचे आदेश

PM मोदींची NEET वर पहिली प्रतिक्रिया, आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत म्हणाले

सायबर फसवणुकीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, तात्काळ ऑटो ई-झिरो एफआयआर नोंदवला जाईल

UPI वापरताना लोक नकळत करतात या 5 चुका

पुढील लेख
Show comments