Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता स्वयंचलित पिंजरा, वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपता येणार

Updated: मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (11:37 IST)
 
अत्याधुनिक असा हा पिंजरा ३० फूट अंतरावर बसूनही रिमोटच्या सहाय्याने संचालित करता येतो. पिंजऱ्यातील यंत्रणेत नेटवर्क असणाऱ्या भ्रमणध्वनी कंपनीचे सिमकार्ड टाकायचे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी असणारा अ‍ॅप संबंधित वनाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीत राहील. पिंजऱ्याच्या आत तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे रात्रीदेखील काम करतील. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पिंजऱ्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपता येतील. विशेष म्हणजे, वाघांच्या अंगावरील पट्टे यामुळे तपासता येतील. त्यासाठी वारंवार पिंजऱ्याच्या जवळ जाण्याची गरज नाही. त्यात आता पुन्हा अत्याधुनिक सेन्सर लावण्यात येणार आहे. ज्यामुळे वन्यप्राणी आता गेल्यानंतर तो आपोआप बंदिस्त होईल. पिंजऱ्याच्या खालच्या बाजूला एक सेन्सर लावण्यात येणार असून या माध्यमातून त्या प्राण्याचे वजन कळेल. याआधी वन्यप्राण्याचे वजन करण्यासाठी त्याला बेशुद्ध करावे लागत होते. चौथा अधिकचा कॅमेरा पिंजऱ्याच्या बाहेर  लावण्यात आला आहे. त्याला ३० फु टाची वायर आहे. ज्यामुळे पिंजऱ्यातील वन्यप्राणी जंगलात सोडताना दुरूनच चित्रीकरण होईल. सौर पॅनलवर आधारित पिंजऱ्याला एक बॅटरीही देण्यात आली आहे. चार्ज करून ठेवलेली ही बॅटरी किमान १८ तास पिंजरा संचालित करू शकेल. त्यामुळे पावसाळ्यात अडचण येणार नाही. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पश्चिम रेल्वेने तिकीट न वापरता प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत ८३.२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला

महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

LIVE: महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा;मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments