Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोडशेडिंगविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे ‘कंदील’आंदोलन...

Updated: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (08:59 IST)
 
राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असतानाच आता वीजमहावितरण महामंडळाकडून लोडशेडिंग केले जात अाहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज ज्याठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे त्याठिकाणी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ठिकठिकाणी युवक संघटनेच्यावतीने निदर्शने करुन निषेध करण्यात आला. शिवाय महावितरण विभागाला निवेदनही देण्यात आले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आज राज्यात ज्या ज्याठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे त्या त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ  यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘कंदील’ आंदोलन करत सरकारला जागं करण्याचं काम केलं. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या गेटला कंदील अडकवून महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर युवक अध्यक्ष संग्राम कोते  यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ठिकठिकाणी वीजमहावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय आजपासून तीन दिवस युवक संघटनेच्यावतीने लोडशेडिंगविरोधात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली.
 
औरंगाबाद, सिंदखेडा, धुळे ग्रामीण, राहुरी, शेवगाव, चिखली, हिंगोली, सेलू, मानवत, पाथरी, बारामती, इंदापूर, दौंड. मावळ, सातारा, उमरेड, अमरावती, अकोले तसेच चंद्रपूर या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पश्चिम रेल्वेने तिकीट न वापरता प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत ८३.२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला

महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

LIVE: महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा;मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments