संबंधित माहिती
- तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं- प्रवीण दरेकर
- गणेशोत्सवासाठी भविष्यात विमानाचीही सोय करू - नितेश राणे
- 'मी म्हणालो, मंत्रिपद गेलं तरी चालेल...'-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन होणार
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध
शिंदे-ठाकरे वादावर 29 ऑगस्टला सुनावणी
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आणि सत्तासंघर्षावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
काल 25 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होईल असे वाटले होते मात्र हा खटला पटलावर आलाच नाही.
आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा निवृत्त होत आहेत. त्यानंतर नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी 8 प्रश्न तयार केले होते, ज्याच्या आधारे घटनापीठ शिवसेना कोणाची आहे, याचा निर्णय घेईल. सुनावणी पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्णय न घेण्यास सांगितले आहे.
