Marathi Biodata Maker

200 जणांवर मधमाशांनी हल्ला

शुक्रवार, 3 मे 2019 (16:52 IST)
पुण्यातल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे येथे चार दिवसीय उन्हाळी शिबिरासाठी दाखल झालेल्या 151 शालेय विद्यार्थ्यांसह 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकांसह ७ जण जखमी झाले आहेत. मे ते 5 मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ या चौथ्या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते.
 
शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणे येथील समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी वाहनातून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारी असणाऱ्या ‘वेळाच्या झाडा’वरील आग्या मोहोळीतील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यानंतर सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. जखमींवर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट

साडी भेट न दिल्याने संतापल्या पत्नीने घेतला जीव! प्रेशर कुकरने डोक्यावर वार करून पतीची हत्या

LIVE: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार; ३० जुलैपूर्वी खात्यात जमा होणार पैसे!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार; ३० जुलैपूर्वी खात्यात जमा होणार पैसे!

दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे; "हे राज्यकर्ते पाकिस्तानमधून आलेत का?" – तीव्र संताप

पुढील लेख
Show comments