Dharma Sangrah

200 जणांवर मधमाशांनी हल्ला

शुक्रवार, 3 मे 2019 (16:52 IST)
पुण्यातल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे येथे चार दिवसीय उन्हाळी शिबिरासाठी दाखल झालेल्या 151 शालेय विद्यार्थ्यांसह 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकांसह ७ जण जखमी झाले आहेत. मे ते 5 मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ या चौथ्या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते.
 
शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणे येथील समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी वाहनातून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारी असणाऱ्या ‘वेळाच्या झाडा’वरील आग्या मोहोळीतील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यानंतर सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. जखमींवर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

बाबा, मी ठीक आहे," असं म्हणत नवविवाहिताची गळफास घेऊन आत्महत्या बीडची घटना

मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना फडणवीस सरकार प्रत्येकी १० लाख रुपये देणार

पुण्यातील हिंजवडी येथील विप्रोमध्ये टीसीएस सारख्याच प्रकार घडल्याचा माजी कर्मचाऱ्याचा दावा

विराट, रोहित आणि हार्दिक जखमी, तिघेही अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेतून बाहेर

गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यांमध्ये मोठा दिलासा, आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला

पुढील लेख
Show comments