1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (10:21 IST)

'समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यायचं असेल, तर राज्यानं निम्मे पैसे द्यावे'

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं असेल, तर राज्य सरकारनं या महामार्गासाठी 50 टक्के पैसे द्यावेत, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलंय.
 
मनमाड ते मुदखेड रेल्वेच्या विद्युतीकरणाचं उद्घाटन दानवेंच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
 
रावसाहेब दानवे म्हणाले, "समृद्धी महामार्गाला आम्ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव देणार होतो. परंतु, आता राज्य सरकार बाळासाहेब ठाकरेंचं नाव देत आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यायचं असेल, तर राज्याने 50 टक्के पैसे द्यावे लागतील."
 
तसंच, "यापुढे कोणत्याही रेल्वे प्रकल्पासाठी राज्याला 50 टक्के पैसे द्यावे लागतील. राज्यातील रेल्वे प्रकल्पाला पैसे दिले तरच प्रकल्प होतील," असेही रावसाहेब दानवे म्हणाले.