संबंधित माहिती
- गिरणी कामगारांना एकत्रितरित्या घरे देण्याचा प्रयत्न -जितेंद्र आव्हाड
- मी माझ्या जातोय माझ्या विठ्ठलासाठी-जितेंद्र आव्हाड
- पूर असताना सदाभाऊ खोत तुम्ही कुठे होता? – आ. जितेंद्र आव्हाड
- कोविड -19 आजपासून मुंबईत कोणतीही वृत्तपत्रे उपलब्ध होणार नाहीत
- स्वित्झर्लंड ते नाशिकच्या प्रवासात कोरोनाची साथ असताना मी स्वतःला वाचवलं .......
राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय : जितेंद्र आव्हाड
सरकारच्या आवाहनानंतरही निर्णयानंतरही राज्यभरात अनेक ठिकाणी नागरिक काम नसताना देखील घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 89 वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
