शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:16 IST)

ममता बॅनर्जी कधीही मोदींबरोबर जातील, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात गेल्या काही दिवसांत वाढलेला तणाव स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या सहकारी म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे. त्यामुळं त्या रंग बदलून परत कधी मोदींबरोबर जातील हे सांगता येणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि युपीएवर टीका केली होती. मात्र देशभरात पसरलेला आणि अस्तित्व असलेला केवळ काँग्रेस हाच पक्ष आहे. त्यामुळं भाजपविरोधात आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही, असंही चव्हाण म्हणाले.
सध्या मोदींच्या विरोधात होत असलेली सर्वपक्षीय एकजुट कमकुवत करण्याचा प्रयत्न ममता करत आहेत. त्याचा फायदा केवळ मोदींना होईल, असंही ते म्हणाले.