Marathi Biodata Maker

MPSC साठी अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या निकषात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी एका पदासाठी 12 उमेदवार पात्र ठरविले जायचे. आता एकूण पदांच्या 16 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार असून, त्याचा मोठा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांना होणार आहे. नव्या निर्णयानुसार मुख्य परीक्षेत उमेदवारांची संख्या वाढणार असली तरी गुणवत्तेची स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरतीसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये पुर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. आतापर्यंत जेवढी पदे आहेत, त्याच्या 12 पट विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. त्यानुसार या परीक्षेतील गुणांचे कट ऑफ ठरविले जात होते. आता पात्रतेचा हा निकषच बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यापुढील परीक्षांसाठी एकूण पदांच्या 15 ते 16 पट उमेदवारांना पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेचे कटऑफ तुलनेने काही प्रमाणात खाली येणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

अमरावती जिल्ह्यात धारणीमध्ये बैलगाडीवर विजेचा खांब कोसळून शेतकरी दाम्पत्य आणि दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: मुंबईच्या मानखुर्द परिसरात तीन मजली चाळ कोसळली

मुंबईत मोठी दुर्घटना; मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ कोसळून ६ जणांचा मृत्यू

उद्धव यांनी रोज रामरक्षा वाचायला हवी… मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी राज्य सरकार कडे राजुरा पुनर्वसन आणि वासनी सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला

पुढील लेख
Show comments