लोणावळा-कर्जत घाटात झालेल्या भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ३६ तासांसाठी विस्कळीत
लोणावळा-कर्जत घाट परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ३६ तासांसाठी विस्कळीत झाला आहे. १४६ गाड्यांवर परिणाम झाला असून कामगार रुळांवरील ढिगारा हटवण्याचे काम करत आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, ५९ गाड्या वळवण्यात आल्या आहे, ४२ गाड्या कमी अंतरावर थांबवण्यात आल्या आहे किंवा कमी अंतरावरूनच सुरू करण्यात आल्या आहे आणि ४ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण १४६ गाड्यांवर परिणाम झाला आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: ठाण्याच्या रुग्णालयात शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी! महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला
लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भूस्खलनानंतर, मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ३६ तासांहून अधिक काळ पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सोमवारी पहाटे ठाकूरवाडी-मंकी हिल आणि मंकी हिल-खंडाळा दरम्यान दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. सुरक्षेच्या कारणास्तव, घाट विभागातील तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. यामुळे देशातील सर्वात व्यस्त मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दोन्ही दिशांना रेल्वे वाहतूक थांबली. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केली जाईल. घाट विभागात ४०० हून अधिक कर्मचारी आणि अभियंते दुरुस्तीच्या कामात अविरतपणे गुंतलेले आहे.मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, ५९ गाड्या वळवण्यात आल्या आहे, ४२ गाड्या कमी अंतरावर थांबवण्यात आल्या आहे किंवा कमी अंतरावरूनच सुरू करण्यात आल्या आहे आणि ४ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण १४६ गाड्यांवर परिणाम झाला आहे.
