शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (11:07 IST)

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं नवीन संकट

सध्या मान्सून सुरु झाले आहे.परंतु अद्याप पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे पेरणीच्या कामाला सुरुवात झाली नाही.महाराष्ट्राच्या काही तालुक्यात दुष्काळाचं सावट आले आहे.यंदाच्या वर्षी पाऊस नसल्याने शेतकरींवर दुष्काळाचं सावट आले आहे.यंदाची पेरणी वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
मराठवाड्यात हे संकट आले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड,लातूर,उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी,या जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुबार पेरणीचं संकट आले आहे.
 
पावसाने सध्या दांडी मारल्यामुळे शेतकरींवर नवे संकट आले आहे.त्या मुळे पाऊस नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे.