1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. plastic ban

प्लॅस्टिक बंदी; सरकारने पाण्याच्या बाटल्यांना वगळले

प्लॅस्टिक बंदीनंतर अवघ्या काही दिवसातच पहिला बदल करण्यात आला आहे. या बंदीतून पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. 1 एप्रिलपासून राज्यभरात प्लास्टिक व थर्माकोल बंदी केली. त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचाही समावेश होता. या बाटल्या पीईटी व पीईटीई प्रकारच्या कच्च्या मालापासून बनविलेल्या असतात. यांचा उपयोग पाणी, खाद्यतेल, सरबते यांच्या साठवणुकीसाठी होतो. काही अटींच्या आधारे राज्य सरकारने बाटल्यांवरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

पुढील लेख
भाजपला त्रस्त जनतेला सत्ताबदल हवाय - सुनील तटकरे