Festival Posters

कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर पुराचे २७ बळी

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (10:20 IST)
पुणे विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर पाच जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे २७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील तब्बल दोन लाख जणांना सुक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही सर्व माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
 
प्रशासनाकडून सुरू असलेले बचावकार्य हे पुरात अडकलेल्या अनेकजणांपर्यंत पोहचले नाही हे उघड होत आहे. अजूनही शेकडोजण आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. तर सरकारकडून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचेही  त्यांनी सांगितले आहे.
 
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी परवानगी दिली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली अभूतपूर्ण पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

LIVE: गडचिरोलीत पोलिसांनी घनदाट जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी शस्त्रनिर्मिती केंद्राचा पर्दाफाश केला

Hindi Journalism Day 2026 Wishes हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश

गडचिरोलीमध्ये माओवादी शस्त्रनिर्मिती केंद्राचा पर्दाफाश, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त

३० मे रोजी हिंदी पत्रकारिता दिन का साजरा केला जातो?

पुढील लेख
Show comments