संबंधित माहिती
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू, हॉटेल, मॉलबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता
- ५० टक्क्यांची मर्यादा उठवल्याशिवाय राज्यात मराठा आरक्षण शक्य आहे का?
- राज्यात कोरोना विषाणूची 5609 नवीन प्रकरणे, आणखी 137 मृत्यू
- 17 ऑगस्टपासून राज्यात शाळा पुन्हा सुरू होतील, शहरी भागात 8 वी ते 12 वी पर्यंत वर्ग चालतील
- राज्यात ५ हजार ६०९ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली
राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयामुळे हॉटेलचालकांच्या लढ्याला यश आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून हॉटेल चालकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कमी आसनक्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांपैकी आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
पुढील लेख
