Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोदामाईच्या साक्षीने शहीद निनाद यांना अखेरचा निरोप

Updated: शुक्रवार, 1 मार्च 2019 (17:49 IST)
 
शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शहीद निनाद यांची पत्नी त्यांच्या चिमुकलीला घेऊन दाखल झाल्या तेव्हा वातावरण अगदी भावूक झाले, चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. यावेळी उपस्थितांना गहिवरून आले होते आणि अनेकांचे डोळे पाणावले होते.
 
सकाळी ८.३० डिजीपी नगर येथे निनाद याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणले. यावेळी निनाद चे नाते वाईक, परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. गुरुवारी रात्री 9.30 वाजता ओझरला आणल्यानंतर प्रथम एअरफोर्सच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. एअरफोर्स स्टेशन येथे पार्थिव रात्रभर ठेवण्यात आले आणि शुक्रवारी दि.1 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता ते कुटुंबीयांना सोपविण्यात आले. अर्धा तास कुटुंबीयांसाठी दिल्यानंतर जवळच असलेल्या के. के. वाघ शाळेजवळील मैदानावर सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळेत ते नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नंतर फेम थिएटरमार्गे अंत्ययात्रा द्वारका सर्कलहून अमरधामकडे अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
 
पालकमंत्री गिरीश महाजन तसेच लोकप्रतिनिधी, ओझर स्टेशनचे एअर कमाडोर समीर बोराडे, देवळाली एअर फोर्स स्टेशनचे कमाडोर पी रमेश तसेच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही अमरधाम येथे निनाद यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. लष्करी धून तसेच हवेत फैरी झाडून निनाद यांना मानवंदना देण्यात आली. निनाद यांच्या कटुंबियांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

LIVE: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघटनात्मक फेरबदल

आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरला परतलेले सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला

पेरूमध्ये पर्यटक विमान कोसळले, वैमानिकासह सर्व १३ प्रवाशांचा मृत्यू

अमेरिका इराणवर हल्ला करणार नाही, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली राहील

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने १३ सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अव्वल ५ मध्ये स्थान मिळवले, एकूण पदकांची संख्या ३९ झाली

पुढील लेख
Show comments