Festival Posters

फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर - शंकरअण्णा धोंडगे

शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (13:06 IST)

सर्वत्र दुष्काळ, नापिकी, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी संकटात असून सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी गुरुवारी लोहा पत्रकार परिषदेत केले.
 

शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत येऊन कर्जाच्या मोठ्या विळख्यात सापडली आहेत. कर्जमाफीच्या कचाट्यातून शेतकरी वर्ग अजूनही सावरला नाही. त्यामुळे विनाअट शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी आज पर्यन्त झाली नाही. परिणामी फडणवीस सरकार असंवेदनशील असून सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन शंकरअण्णा यांनी किसान मंच शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत लोहा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 

पुढे बोलताना ते म्हणाले की विदर्भातील शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था असून छत्तीस कोटी रुपयाचे सोयाबीन अनुदान अजूनही सरकारने दिलेले नाही.

परिणामी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन सुलतानी संकटाचा सामना कारावा असे मत त्यांनी मांडले. यावेळी बाबासाहेब देशमुख, माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, संजय पाटील कराळे, छत्रु महाराज, शिवराज पवार, बंटी सावंत, जीवन वडजे आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

जळगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून चार मुलांची हत्येच्या आरोपीला सहा वर्षांनंतर फाशीची शिक्षा

LIVE: युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये एका भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन

संरक्षण क्षमतेला एक नवीन आयाम मिळणार; भारत २०,००० कोटी रुपयांचे स्वदेशी ड्रोन खरेदी करणार

'इंडिया' आघाडीत बिघाड? द्रमुक-काँग्रेस वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

पुढील लेख
Show comments