suvichar

'त्या' आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना फोन केला

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (16:28 IST)
भाजपमध्ये गेलेल्या आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. गरज पडली तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे आणि साताऱ्यातील हे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 
लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते, विद्यमान आमदार भाजपमध्ये गेले होते. याशिवाय अनेकांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या 4 जणांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेत गेलेल्या एकाच आमदाराचा विजय झाला.
 
राष्ट्रवादीतून आलेले भाजपचे तिकीटधारक
 
बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर – विजयी
राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद – विजयी
नमिता मुंदडा – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड विजयी
शिवेंद्रराजे – सातारा – विजयी
राष्ट्रवादीतून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक (Incoming Outgoing for Candidature)
 
भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरी – विजयी
पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे – पराभूत
दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत
जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड – पराभूत
रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर – पराभूत
शेखर गोरे – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा – पराभूत

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

उद्धव यांनी रोज रामरक्षा वाचायला हवी… मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी राज्य सरकार कडे राजुरा पुनर्वसन आणि वासनी सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला

भारतातील ४५% घरे इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी सुरक्षित नाही

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

मुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे सोने जप्त, महिला प्रवाशाला अटक

पुढील लेख
Show comments