Festival Posters

राधाकृष्ण विघे पाटीलांचे आरोप दुर्भाग्यपुर्ण - विदर्भाची जनता जाब विचारणार - किशोर तिवारी

मुंबईचा विकास आराखडा बिल्डरांना समोर ठेऊन  तयार करण्यात आला असुन यामध्ये सुमारे १ लाख कोटीची जमिनीचे कैरात वाटण्यासाठी १० हजार कोटींचा भ्र्ष्टाचार झाल्याचा मांडवनीकार विरोधी पक्ष नेते म्हणून मागील चार वर्षात प्रसिद्धी मिळविलेल्या राधाकृष्ण विघे पाटीलांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुर्भाग्यपुर्ण असुन ज्याप्रमाणे काँग्रेसचे आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेवर एकही भ्र्ष्टाचाराचा वा नियमाविरुद्ध काम केल्याचा आरोप  आम्ही करू शकत नाही तसेच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्र्ष्टाचाराचा वा नियमाविरुद्ध काम केल्याचा आरोप करणे हा आरोप संपूर्णपणे हास्यस्पद असुन यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचेच नुकसान होणार जर राधाकृष्ण विघे पाटीलांनी जाहीर माफी मागीतली नाही तर त्यांना विदर्भाचे शेतकरी शेतमजुर व आदीवासी खुला विरोध करतील व त्यांच्या विदर्भ दौऱ्यात जाब विचारतील असा इशारा विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे. 
 
सकाळी सरकारला शिव्या देऊन संध्याकाळी वर्षा बंगल्यावर हजेरी लावणाऱ्या राधाकृष्ण विघे पाटीलांनी  आपल्या मागील चार वर्षात  मांडवनीकार विरोधी पक्ष नेते काँग्रेसमधे नावलौकिक मिळवील्यामुळे त्यांना काँग्रेसने संघर्ष यात्रेत बाजुला सारले आहे. आपल्या सार्वजनिक जीवनात सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या शाळा कॉलेज साखर कारखाने व दारूचे कारखाने काडून  सरकारी अनुदान व जनतेची लूट करून  हजारो कोटीची संपत्ती जमा करणाऱ्या भ्र्ष्ट नेत्याने ज्या आमदाराने आपल्या १५ वर्षाच्या आमदारकीच्या काळात व मुख्यमंत्री झाल्यावरही एकही  शाळा कॉलेज साखर कारखाने व दारूचे कारखाने काढले नाही एकही साधा कंत्राट घेतला नाही वा कुटूंबाच्या एकाही माणसाला सरकारी योजनेत भागीदारी घेण्यास मज्जाव केला साध्या राज्यमंत्रीचाही अनुभव नसतांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा भार भाजपने दिला त्यांनी चार वर्षात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी राजकीय अस्तिव  नसलेल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन दररोज १८ तास काम करून विकासाचे व लोककल्याणकारी नवे पर्व सुरु केले ,आज अख्ख्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपला स्पष्ट येत्या निवडणुकीस मिळाल्यास आश्यर्य वाटू नये अशी परीस्थिती हे सत्य  विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विघे पाटीलांनी जाणावे असा सल्ला किशोर तिवारी यांनी दिला आहे. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: "देणगी द्या नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

दिल्लीतील साकेतमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरु

शार्दुल ठाकूर मुंबईच्या टी२० लीगची धुरा सांभाळणार, संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली

महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार

"देणगी द्या नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुढील लेख
Show comments