Festival Posters

पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे

सोमवार, 5 मार्च 2018 (15:25 IST)
बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर राज्यातील शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. यामुळे आता परीक्षा निकाल वेळेत लागणार आहे.
 
आजपासून  पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पेपर तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बहिष्कार टाकला होता. शासकीय आदेश दिल्यामुळे मागण्यांबाबत या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचं शिक्षक महासंघाने जाहीर केलं.
 
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 
तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका बारावीच्या विविध विषयांच्या तपासणीविना पडून होत्या.शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली नव्हती. नियमानुसार पाच जूनपूर्वी बारावीचा निकाल लावणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मोठा तिढा सुटला आहे. यामुळे आता सर्व सुरळीत होईल असे चिन्हे आहेत.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

बाबा, मी ठीक आहे," असं म्हणत नवविवाहिताची गळफास घेऊन आत्महत्या बीडची घटना

मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना फडणवीस सरकार प्रत्येकी १० लाख रुपये देणार

पुण्यातील हिंजवडी येथील विप्रोमध्ये टीसीएस सारख्याच प्रकार घडल्याचा माजी कर्मचाऱ्याचा दावा

विराट, रोहित आणि हार्दिक जखमी, तिघेही अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेतून बाहेर

गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यांमध्ये मोठा दिलासा, आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला

पुढील लेख
Show comments