Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आदिवासी पाड्यातील ३५ मुलींची निवड

Updated: रविवार, 3 सप्टेंबर 2017 (17:03 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वतीने पुण्यात श्री भगवानराव नपाते फौंडेशनमध्ये रुग्णसहायक अभ्यासक्रम चालविण्यात येतो. समाजातील गरजू मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात सावित्रीबाई फुले फौंडेशनच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील शेरपाडा, देवरगाव येथील ३५ आदिवासी मुलींची निवड करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कुलगुरू प्रा. वायुनंदन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले फौंडेशनच्या श्रीमती स्वाती वानखेडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, त्र्यंबक भागवत, मधुकर राऊत, शिक्षणशास्र विद्याशाखेच्या संचालक डॉ. संजीवनी महाले आदी उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलीनी शिक्षणाच्या प्रवाहात यायला हवे. याकामी आपण विद्यापीठातर्फे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकीतून चालविण्यात येणाऱ्या पुण्याच्या श्री भगवानराव नपाते फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेत सध्या गरीब आणि वंचित घटकांतील शेकडो मुली नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असून आजवर दोन हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी हा शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या या संस्थेतील जवळपास हजारहून अधिक मुली महाराष्ट्रील नामांकित हॉस्पिटलांत रुग्णसेवेचे काम करीत असून पुढील काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवा, सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आज नोकरी मिळवण्याकरता मल्टीस्किल असणे आवश्यक आहे. हे स्किल देण्याचे काम मुक्त विद्यापीठ करीत असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञानतज्ञ अर्चना देशमुख यांनी यावेळी आदिवासी महिला आणि किशोरवयीन मुलींना फळप्रक्रियेबद्दल माहिती दिली.

आदिवासी मुलींचे शिक्षणशुल्क माफ
विशेष म्हणजे, रुग्णसहायक अभ्यासक्रमासाठी आदिवासी भागातील निवड करण्यात आलेल्या ३५ मुलींचे शिक्षण शुल्क विद्यापीठाच्या वतीने माफ करण्यात आल्याचे कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी यावेळी सांगितले. शिवाय विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी या मुलींच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती स्वाती वानखेडे यांनी केले. त्र्यंबक भागवत यांनी आभार मानले. यावेळी आदिवासी भागातील महिला, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

स्वातंत्र्यदिनी उठून दिसण्यासाठी अशा प्रकारे करा मेकअप

सर्पदंशामुळे ३ आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

LIVE: गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

एसटी बस स्थानकांच्या इमारतींना वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप देण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

ठाणे आणि पालघरमध्ये देशद्रोही सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या ५ तरुणांना अटक

पुढील लेख
Show comments