गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (22:10 IST)

Dating Tips: डेटिंगच्या सुरुवातीच्या दिवसात चुकूनही ही चूक करू नका, नात्यात दुरावा येईल

online dating
जेव्हा दोन लोक रिलेशनशिपमध्ये येतात आणि एकमेकांना डेट करायला लागतात, तेव्हा ते त्यांचे नाते यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. रिलेशनशिपचा विचार करताच लोक जोडीदारासोबत नातं दृढ करायचा प्रयत्न करत असतात.  त्याला आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडीची काळजी घ्यायची असते. पण अनेकवेळा नवीन नातं तयार झालं की जोडपं उत्साहात अशा काही चुका करतात, मग जोडीदाराच्या मनात त्यांच्याबद्दल शंका निर्माण होतात. डेटिंगच्या सुरुवातीच्या दिवसात झालेल्या चुकांमुळे पार्टनरला तुमच्या प्रेमावर विश्वास बसत नाही आणि नातं जास्त काळ टिकत नाही. डेटिंग आणि रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात या चुका करणे टाळा.
 
तुम्ही नवीन नातेसंबंधात प्रवेश करता आणि डेटिंग सुरू करता तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये काळजी घ्या. डेटिंगच्या अगदी सुरुवातीलाच जोडीदारासोबत प्रत्येक गोष्टीत घाई करू नका. नात्यातील प्रेम आणि आदर दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी विचारपूर्वक पावले उचला. नात्याच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून नाते अधिक घट्ट होईल. कोणत्याही बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका.
 
 1 माजी मित्राचा उल्लेख करणे टाळा -
 
तेव्हा तुम्ही एखाद्या नवीन नात्यात जुडता तेव्हा तुमचे जुने नाते किंवा माजी मित्राला विसरले पाहिजे. जर तुम्ही डेटिंगच्या सुरुवातीच्या काळात माजी व्यक्तीला विसरू शकत नसाल आणि  जोडीदारासमोर त्यांच्याबद्दल बोलत असाल तर नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डेटिंगच्या सुरुवातीला  जोडीदाराला माजी मित्रा बद्दल सांगू नका
 
2 कोणाशीही जोडीदाराची तुलना करू नका-
नात्यात आल्यानंतर जोडीदाराची तुलना माजी व्यक्तीसोबत करू नका किंवा  जुन्या नात्याची तुलना या नवीन नात्याशी करू नका. जेव्हा लोक वारंवार त्यांची माजी सोबत तुलना करतात तेव्हा पार्टनरला ते अजिबात आवडत नाही.आणि नात्यात दुरावा येतो.
 
3 नातेसंबंध टिकवणे -
अनेक वेळा किरकोळ भांडणे आणि मतभेद होतात, परंतु राग आणि अहंकार विसरून तुम्ही तुमच्या जोडीदाराशी समेट करावा. नाती मजबूत ठेवण्यासाठी कधी कधी नतमस्तक व्हावे लागते. एखाद्याने कोणत्याही वियोगाच्या शक्यतेवर जोडीदाराशी बोलले पाहिजे आणि नातेसंबंध वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.