suvichar

राष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना

शुक्रवार, 30 मार्च 2018 (14:17 IST)
भारताच्या सायना नेहवालला मागील काही स्पर्धांत चमकदार कामगिरी करता आलेली नाही; पण गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिला 2010च्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे.
 
सायना म्हणाली, नवी दिल्लीत झालेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकतक्त्यात भारत दुसर्‍या स्थानावर राहिला. या स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक होता आणि भारताने 99 पदके जिंकली होती. शेवटच्या दिवशी भारतीय पुरुषसंघाची अंतिम लढत आणि बॅडमिंटन महिला एकेरीची अंतिम लढत होती.
 
मी सुवर्णपदक जिंकले आणि हॉकी संघाने रौप्यपदक. सुवर्णपदक जिंकून शंभरावे पदक भारताच्या खात्यात जमा करू शकले, याचा आनंद आहे.' त्या वेळी सायना अवघ्या 20 वर्षांची होती. त्या वेळी ती राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.
 
त्याचबरोबर तिच्या सुवर्णपदकाने भारताने (38 सुवर्ण) पदकतक्त्यात इग्लंडला (37 सुवर्ण) मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे 2010च्या स्पर्धेच्या आठवणी कधीही विसरणार नाही, असे सायना म्हणाली.
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

गुन्हे शाखेने पुण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकला; तीन अल्पवयीन मुलांसह १५६ श्रीमंत व्यक्तींना ताब्यात घेतले

१५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलामुलींचे आधार कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते, माहिती जाणून घ्या

LIVE: वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

वनप्लस टर्बो 6X आणि 6X प्रो चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले, किंमत वैशिष्टये जाणून घ्या

पुढील लेख
Show comments