Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला तुंबई होण्यापासून वाचवू शकतात हे 11 उपाय

Updated: बुधवार, 3 जुलै 2019 (12:48 IST)

मुंबई पाण्यात तरीही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 25% कमी पाऊस
 
5. व्हिजनची गरज
मुंबईसारख्या शहराला नियोजनाच्या दृष्टीने व्हिजनची आवश्यकता आहे. मात्र, त्याची मोठी कमतरता जाणवते, अशी खंत पर्यावरण तज्ज्ञ ऋषी अगरवाल यांनी व्यक्त केली. मात्र, हे व्हिजन केवळ प्रशासन किंवा सरकारचं असून चालणार नाही, तर नागरिकांमध्येही असायला हवं, असंही ऋषी अगरवाल यांनी नमूद केलं.
 
"आपण ज्या शहरात राहतो, त्या शहराबद्दल एक आपुलकीची भावना असते, ती इथल्या उद्योगपती, राजकीय नेते आणि लोकांमध्ये तुलनेने कमी जाणवते. सगळ्यांनीच जबाबदारीने शहराच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, तर नक्कीच फरक पडू शकतो," असेही अगरवाल म्हणाले.


 
6. यंत्रणांच्या समन्वयाची गरज
मुंबई शहराच्या विविध गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. या सर्व यंत्रणांचा कमी-अधिक प्रमाणात शहराच्य व्यवस्थापनाशी संबंध येत असतो. या सर्व यंत्रणांमधील समन्वय कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे.
 
मिठी नदीच्या स्वच्छतेवरून एमएमआरडीए आणि मुंबई महापालिका यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे, असं मत अमिता भिडे यांनी व्यक्त केले. तसंच, नगरनियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनीही यंत्रणांच्या गुंत्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
"प्रशासन हताश आहे कारण निर्णय प्रक्रिया त्यांच्या हातात नाही. ज्यांच्या हातात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यांच्याकडे दृष्टीकोन नाही आणि ज्यांच्याकडे दृष्टीकोन आहे त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत," अशी शब्दात महाजन यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली
 
7. काँक्रिटीकरण थांबवायला हवं
मुंबई रक्षण समितीचे अॅड. गिरीश राऊत यांनी एका लेखात म्हटले आहे की, मुंबईचा काँक्रिटीकरणरुपी विकास थांबवायला हवा. मेट्रो प्रकल्प आणि त्यातही 'मेट्रो-३' हा भुयारी रेल्वे प्रकल्प आणि 'सागरी रस्ता' हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज आहे.

मुंबई: मुसळधार पाऊस, वाहतुकीची स्थिती (बघा फोटो)
 
8. अहवाल, योजना आणि आराखडे काय सांगतात?
मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याशी संबंधी ब्रिमस्टोवॅड योजना (1993), डॉ. माधवराव चितळे समितीचा अहवाल (2006) आणि आआयटी पवईने तयार केलेला कृती आराखडा (2006) महत्त्वाचा मानला जातो. यांमधील शिफारशी मुंबईच्या जलआपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात.
 
9 'ब्रिमस्टोवॅड' योजनेत नेमकं काय होतं?
1985 सालीही मुंबईत प्रचंड प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यानंतर नव्वदच्या दशकात मुंबई महापालिकेने शहर नियोजनासंदर्भात अभ्यासासाठी जाणकरांना एकत्र करुन योजना आखली. बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (BRIMSTOWAD) असं त्या योजनेचं नाव.
 
या जाणकारांनी 1993 साली अहवाल सादर केला होता. या अहवालात मुंबईच्या नियोजनसंदर्भातील अत्यंत मुलभूत आणि महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या होत्या.

मुंबईकरांसाठी साई दर्शन होणार अधिक सोपे
 
ब्रिमस्टोवॅडने केलेल्या शिफारसी
पावसाचं पाणी सहज वाहून जावं यासाठी नद्या आणि नाल्यांची पात्रं रुंद आणि खोल करावी
नद्या -नाल्यांच्या काठावर संरक्षक भिंत उभाराव्यात
भूमिगत गटारांचं जाळ अधिक बळकट करावं
ज्या सखल भागात पाणी साचतं, अशा आठ ठिकाणी पंपिंग व्यवस्था सुरु करावी
'ब्रिमस्टोवॅड' योजनेला सुद्धा शासन-प्रशासनाकडून गांभिर्याने घेतलं जात नाही. मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या प्रामुख्याने सुधारणा आवश्यक आहेत, त्यांची यादी या योजनेत असल्याचं नगरनियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन म्हणाल्या.


 
10. डॉ. चितळे समितीने काय शिफारशी केल्या?
26 जुलै 2005 साली मुंबईत पूर आल्यानंतर मोठी जीवितहानी झाली होती. यानंतर पर्यायवरण तज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षेतत समिती स्थापन केली. या समितीने 2006 साली अहवाल सादर करुन, महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या.
 
डॉ. चितळे समितीने केलेल्या शिफारसी
स्वयंचलित पर्जन्यमापक बसवणे
सर्व पाणलोटांचे नकाशे बनवून, प्रवाहाची गती मोजणं, गाळ उपसा नियमित करणं
अतिक्रमणे हटवणं
प्लास्टिकवर बंदी आणि सांडपाण्याची नियोजनबद्ध व्यवस्था करणं
नवीन पंपिंग स्टेशन उभारणं
मिठी नदीच्या दोन्ही बाजूला 15 मीटरच्या रुंदीच्या चॅनल बनवणे
11. आयआयटी पवईने तयार केलेल्या कृती आराखड्यातील शिफारशी
मुंबईतील 2005 च्या पुरानंतर आयआयटी पवईच्या माध्यमातून मिठी नदीचा विशेष अभ्यास करण्यात आला.
 
2006 साली सादर करण्यात आलेल्या या अहवालातून मिठी नदीच्या 200 मीटरच्या पट्ट्यात काय उपाययोजना करायला हव्यात, याचा आराखडा तयार करण्यात आला होता.
 
नदीजवळील संपूर्ण परिसर इकोझोन म्हणून घोषित करणे
नदीच्या प्रवाहातील सातत्य टिकवण्यासाठी व्यवस्था करणं
पात्रातील अडथळे दूर करणं
सांडपणी शुद्धीकरण करूनच नदीत सोडणं
नदीच्या पात्राजवळील अतिक्रमणे हटवणे
घनकचरा नदीत टाकण्यास मनाई करणे

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments