suvichar

डॉ. अब्दुल कलाम यांची इस्रोत निवड करणारे मराठी शास्त्रज्ञ डॉ. चिटणीस

Updated: सोमवार, 29 जुलै 2019 (10:24 IST)
डॉ. एकनाथ चिटणीस - पंडित नेहरूंचा प्रचंड पाठिंबा होता. आम्ही सुरुवात केली तेव्हा अर्थसंकल्पात अवकाश संशोधनाविषयी कुठल्याही निधीची तरतूद नव्हती. पण नेहरूंनी आम्हाला उणीव भासू दिली नाही. ते मदत करत सुटले. पुढे इंदिरा गांधी यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्हाला खूपच मदत केली.
 
स्पेस प्रोग्राम प्रचंड धोकादायक असतो. एखादं मिशन फेल होऊ शकतं. आपल्याकडे आपण प्रयत्न करत नाही, कारण आपण अपयशाला घाबरतो. आम्हालासुद्धा अनेक अपयश आले. पण इंदिरा गांधी आमच्या मागे ठाम उभ्या होत्या. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही महत्वाची भूमिका बजावली.
 
प्रश्न - भारतातल्या कम्युनिकेशन तंत्रज्ञानाची काय स्थिती होती. INSAT ची सुरुवात कशी झाली?
डॉ. एकनाथ चिटणीस - कम्युनिकेशनची स्थिती दयनीय होती. लोकांकडे टेलिफोन नव्हते. पुण्याहून मुंबईला फोन करणंही अवघड होतं. उपग्रह तंत्रज्ञान (satelite) येण्यापूर्वी हे सगळं जमिनीवरून व्हायचं.
 
उपग्रह तंत्रज्ञान आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे तंत्रज्ञान वापरून आपण क्रांती करू शकतो. पण सरकारी विभागांचा आमच्यावर विश्वास नव्हता. मात्र नंतर इंदिरा गांधी यांचा पाठिंबा मिळाला. आम्हाला अमेरिकेनंसुद्धा मदत केली. आम्ही सरकारला सिध्द करून दाखवलं की उपग्रहाद्वारे संपूर्ण भारतात संपर्काचं जाळं तयार करू शकतो. नाहीतर पारंपरिक पद्धतीने जर आपण वाट बघितली असती तर आपण कम्युनिकेशनमध्ये 20 वर्षे मागे असतो.
 
कम्युनिकेशन सॅटेलाईटबरोबरच शेती, हवामान यांसाठी देखील उपग्रह माहिती देऊ शकतो. त्यामुळे आपला कार्यक्रम भारदस्त झाला. याचा फायदा देशाला झाला. यामुळे आम्हाला केंद्र सरकारचा प्रचंड सपोर्ट मिळाला. अगदी पेन्सिल रॉकेटपासून कलाम यांनी सुरुवात केली होती. आता आपण चंद्रावर जाणारे रॉकेट तयार करू शकलो ही अलिकडच्या 35 वर्षांतील प्रगती आहे.
 
आम्ही शास्त्रज्ञांची एक पिढी तयार केली. जिथं अमेरिकेला दहापट खर्च येतो. तिथं हे शास्त्रज्ञ अतिशय कमी पैशात तंत्रज्ञान विकसित करू लागले. यामुळे आम्हाला शासनाचा पाठिंबा मिळत राहिला. इंदिरा गांधी आणि त्यानंतर आलेल्या सरकारनेही तसाच पाठिंबा दिला.
 
प्रश्न - अवकाश संशोधन संस्थेच्या टीमच्या निवडप्रक्रियेत तुम्ही होता? डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची निवडही तुम्ही केली होती?
डॉ. एकनाथ चिटणीस - खरंतर या निवडीची सुरुवात अहमदाबादमधल्या फिजिकल लॅबपासून झाली. तिथले विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक होते. आम्ही तिथले विद्यार्थी घेतले आणि काही बाहेरून घेतले. आम्हाला टीम निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. तिथं यूपीएससी वगैरे भानगड नव्हती.
 
आम्हाला सरकारने मुभा दिली होती. चांगला मनुष्य आहे तर घ्या इतकी साधी प्रक्रिया होती. अब्दुल कलाम यांचा बायोडाटा विक्रम साराभाई यांच्याकडे आला. त्यांनी मला दाखवला. म्हणाले, "हा बघ कसा वाटतोय?" मी बायोडाटा बघून "छान आहे, घेऊयात," असं म्हटलं आणि कलाम यांची निवड झाली.
 
या सगळ्या प्रक्रियेमुळे वेळ वाचायचा. सगळे उत्साहाने काम करायचे. शून्यापासून सुरुवात होती. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. थांबायला वेळ नव्हता. थुबा येथील चर्चमध्ये काम सुरू केलं. बिल्डिंग बांधण्याच्या फंद्यात पडलो नाही. त्यामुळे आम्ही लवकर काम सुरू करू शकलो.
 
प्रश्न - अवकाश संशोधनातील इतिहास घडत असताना तुम्हाला अनेक अपयश देखील आले. आर.के. लक्ष्मण यांनीही व्यंगचित्र रेखाटली होती ?
डॉ. एकनाथ चिटणीस - आम्ही सगळे अशा टीका-टिप्पणीपासून बाजूला राहिलो. शासनातील अनेकांना माहीत होत अपयश येणारच. आम्हालासुद्धा अपयश येणार हे माहीत होतं. पण यातूनच आम्ही यशस्वी होणार, हे सुद्धा माहीत होतं. आमची 'सायंटिफिक लीडरशीप' खंबीर होती.
 
विक्रम साराभाई, होमी भाभा यांचा पंतप्रधानांशी चांगला संपर्क होता. पंतप्रधानांचा यांच्यावर विश्वास होता. इंदिरा गांधी स्वतः उपग्रह प्रक्षेपणाला उपस्थित रहायच्या. आमच्याबरोबर मिसळायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे 'फर्स्ट हॅण्ड' माहिती असायची. यामुळे जर अपयश आलं आणि आमच्यावर टीका झाली तरी त्याचा परिणाम पंतप्रधानांवर व्हायचा नाही. त्यामुळं व्यंगचित्रंसुद्धा रद्दीत जायची.
 
प्रश्न - चांद्रयान 2 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं. भारत ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणार आहे का?
डॉ. एकनाथ चिटणीस - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणार आहे. चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ आहे. चंद्राबद्दल अजून खूप माहिती मिळवणं बाकी आहे. विश्व कसं निर्माण झालं, पहिल्या 3 सेकंदात काय झालं, कृष्ण विवर कसे बनले, तारे कसे बनले, हे सर्व माहीत करून घेणं प्रचंड कुतूहलाच आहे.
 
आईनस्टाईन सारख्या शास्त्रज्ञाने 100 वर्षांपूर्वी सांगितलेला सापेक्षतेचा सिद्धांत आजच्या काळात साधन उपलब्ध झाल्यानंतर तपासला असता खरा ठरला. तेव्हा साधन नसल्याने शास्त्रज्ञांनी कल्पना केल्या होत्या. हे सगळंच प्रचंड उत्साह वाढविणारं आहे.
 
प्रश्न - भारताचं अवकाश संशोधनातील भविष्य कसं आहे?
डॉ. एकनाथ चिटणीस - मी अनेक शाळा महाविद्यालयांत जातो तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा होते. विद्यार्थी खूप चांगले प्रश्न विचारतात. पण त्यांचे पालक त्यांना सुरक्षित करिअर निवडायला सांगतात. प्युअर सायन्समध्ये करिअर करण्यास मनाई करतात.
 
मी अशा विद्यार्थ्यांना सांगेन, तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा, तुमच्या आई वडिलांचं ऐकू नका. आपल्याकडे इतकी हुशार मुलं आहेत. त्यापैकी एक टक्का मुले जरी फुलली तरी भारताच अवकाश संशोधनात उज्जवल भविष्य आहे, अस मला वाटतं.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments