Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतदानाचा सातवा टप्पा, मोदींसह अनेक हाय-प्रोफाईल उमेदवार रिंगणात

Updated: रविवार, 19 मे 2019 (11:04 IST)
 
या टप्प्यात 10 कोटी मतदार मतदान करतील. 909 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात होईल.
 
दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघातून मतदानाचा अधिकार बजावला.
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.
 
माजी केंद्रीय मंत्री आणि आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांनी लुधियानामधील मतदान केंद्रावर मतदान केलं.
 
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही पाटण्यामध्ये मतदान केलं.
 
भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदौरमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.
 
हाय-प्रोफाईल लढती
शेवटच्या टप्प्यांत सर्वांचं लक्ष असेल ते वाराणसी मतदारसंघाकडे. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय आणि समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव आहेत.
 
गोरखपूर मतदारसंघातून भाजपनं प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. सप-बसप आघाडीनं रामभुआल निषाद आणि काँग्रेसच्या मधुसूदन तिवारी यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिलीये.
 
बिहारच्या पटना साहिब मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या बिहारमधील सासाराममधून निवडणूक लढवत आहेत.
 
पंजाबमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी अमृतसरमधून निवडणूक लढत आहेत. गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओल आणि चंदीगढमधून अभिनेत्री किरण खेर या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 
उत्तर प्रदेशमधील गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर आघाडीचे उमेदवार अफजाल अन्सारींचं आव्हान आहे.
 
झारखंडमधील दुमका मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन निवडणूक लढवत आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments