Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट घेतल्यानंतर कसं बदलतं आयुष्य?

Updated: गुरूवार, 4 जुलै 2019 (13:50 IST)
 
जेव्हा एका लग्नामध्ये भावनांतील उत्कटता कमी होऊ लागते, तेव्हा ते नातं तुटण्याची सुरूवात होऊ लागते. रेचल आणि रॉब दोघंही स्वतःला पीडित संबोधतात.
 
रेचल म्हणाली, "लग्नानंतर दोन वर्षांतच मला कळलं, की माझ्या पतीचं दुसऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे. हे कळल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं. मात्र मला लग्न मोडायचं नव्हतं. त्यामुळेच या खोटेपणावर मी पांघरूण घातलं. सहा महिने लग्न वाचवण्याचे प्रयत्न केले."
 
मात्र विश्वास तुटल्यानंतर नात्यात पोकळी निर्माण झाली. अखेरीस रेचल आणि रॉब यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
 
मात्र त्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
 
रेचल सांगते, "जेव्हा तुम्ही आपल्या जोडीदाराच्या अफेअरबाबत कळूनसुद्धा त्याच्यासोबत सहा महिने राहता तेव्हा अडल्ट्रीच्या (व्यभिचार) आधारावर तुम्ही कायदेशीररित्या घटस्फोट घेऊ शकत नाही. इतकं दुःख सहन करूनसुद्धा लग्न वाचवल्याची शिक्षा मला दिली जात असल्याचं मला वाटायचं.
 
रॉबला वाटतं, की पत्नी निघून गेल्यानंतर त्यांना कळालं की कायदेशीररित्या घटस्फोट हवा असेल तर आणखी एक वर्ष या नात्यात राहावं लागेल.
 
आपलं दुःख सांगताना रॉब म्हणतो, "हे सगळं घडल्यानंतर असं वाटलं होतं की माझ्या आयुष्यात मी पुढे जाऊ शकणार नाही. मी सिंगल पॅरेंट होतो. मला केवळ या सर्व गोष्टींतून बाहेर पडायचं होतं. या सगळ्यांनी मला खूप मानसिक ताण दिला होता.
 
दोघांनी वाट पाहण्याऐवजी 'अनुचित व्यवहार' (ज्या कारणांमुळे सोबत राहण्याची इच्छा नाही त्यांची यादी जमा करावी लागेल) च्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज करणं त्यांना योग्य वाटलं.
 
रेचल सांगते, "तुमचे सगळे मित्र त्यांच्या आयुष्यात सेटल होत असताना हे सगळं होत असेल तर ते खूप कठीण असतं."
 
31 वर्षीय रूबीनंही लग्नाच्या दोन वर्षानंतर नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
 
आम्ही लग्नंच करायला नको होतं
ती सांगते, "तो अनेक गोष्टींमध्ये चांगला होता. मात्र प्रत्येक छोट्या गोष्टीवरून आमच्यात वाद व्हायचे. भांडणं व्हायची. गैरसमज खूप वाढले होते. एकेदिवशी मी त्याला दुसऱ्या महिलेला मॅसेज करताना पाहिलं. त्यादिवशी मला वाटलं की आम्ही लग्नंच करायला नको होतं."
 
रूबीच्या आईने घटस्फोटाच्या वेळी तिची साथ दिली नाही. एक चांगली पत्नी बनून राहा, असं तिची आई तिला सांगायची. रूबी आपलं घर सोडून वेगळं राहू लागली.
 
मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राहेल अँड्र्यू सांगतात, की जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींपैकी खूपच कमी व्यक्ती अशा गोष्टींतून गेल्या असतील तर तुम्हाला जास्त एकटं वाटतं.
 
रिलेशनशिप थेरपिस्ट आणि 'द हॅप्पी कपल हँडबुक'चे लेखक अँड्र्यू जी मार्शल याला दुजोरा देताना सांगतात, "घटस्फोटामुळं नेहमी तुमचा आत्मसन्मान दुखावतो. यातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये लाज आणि अपयशाची भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना प्रेमात पडलेले पाहता त्या स्थितीत अशा भावना जास्त प्रमाणात निर्माण होतात."
 
रेचलसाठी आता मित्रांना भेटणंही कठीण बनलं आहे. ती सांगते, "माझे मित्र आपल्या जोडीदारासोबत चांगलं नातं निभावत आहेत. त्यांच्यासोबत वेळ घालवणं माझ्यासाठी खूप त्रासदायक बनलं होतं."
 
डॉक्टर अँड्र्यू सांगतात, "आपल्या मित्रांपैकी सर्वात आधी तुमचं लग्न तुटल्यास एक भावनिक तणाव असतो. राग, भीती, नैराश्य या सर्व भावना तुमच्यात आलटून पालटून येत असतात. मात्र जितका जास्त आयुष्याचा अनुभव तुमच्याकडे असेल, तेव्हा तुमच्या भावनांचा योग्य प्रकारे वापर करणं तुम्ही शिकाल. परंतु नवयुवकांना अशा गोष्टी समजण्यास अडचणी येतात.
 
रॉब सांगतो, की मित्रांना भेटणं खूपच अवघड होतं. अनेक वर्षांपासून मित्र असलेले आम्ही काहीजण प्रत्येक शुक्रवारी दारू पिण्यासाठी पबमध्ये जमायचो. माझ्या मनातलं दुःख मी दारुमध्ये विसरायचा प्रयत्न करायचो. मी दारू पिऊन भांडणं केली आहेत. मला खरंच याची लाज वाटते. मी माझ्या घराच्या खिडकीची काचसुद्धा फोडून टाकली होती.
 
"माझे मित्र माझी साथ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. त्यांना वाटायचं, की बाहेर घेऊन गेल्यानंतर, दारू पाजल्यानंतर मला बरं वाटेल, पण अखेरीस मी केवळ रडत बसायचो. माझ्याशी काय आणि कसं बोलायचं हे त्यांना कुणालाही समजत नसे. दारू पिणं सोडल्यानंतर सगळं ठीक होईल, असं मला वाटलं. त्यामुळं मी सहा महिने दारू प्यायलो नाही."
 
सुखद भविष्याची आस
रूबी आपले आई-वडील आणि जुन्या मित्रांपासून दूर गेली. दुसऱ्या शहरात जाऊन नवी नोकरी करू लागली. सहा महिन्यांनंतर ती पुन्हा डेट करू लागली.
 
"पहिली डेट खूपच वाईट ठरली. मी 29 वर्षांची होते आणि मुलगा 26 वर्षांचा. मी घटस्फोट घेत असल्याचं सांगितल्यानंतर त्याने मला अत्यंत विचित्र वागणूक दिली. त्यानंतर इतरांसोबत माझ्या घटस्फोटाबाबत चर्चा करणं मी टाळू लागले."
 
डॉक्टर अँड्र्यू सांगतात की नातं तुटल्यानंतर अपराधी वाटणं स्वाभाविक आहे. "जे काही घडलं ते तुमच्या दोघांतील नात्यामुळं घडलं, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे तुमच्याबद्दल अथवा दुसऱ्या व्यक्तिबद्दल कोणतंही जजमेंट नाही. आपण चांगली व्यक्ती नाही त्यामुळेच हे सर्व घडल्याचं युवकांना वाटतं."
 
रूबी आणि रेचल दोघंही आता नव्या नात्यात जाण्यापूर्वी थोडा वेळ घेत आहेत. मात्र रॉबनं नुकतंच डेट करणं सुरू केलं आहे.
 
रॉब सांगतो, "माझी पहिली पत्नी आणि मी आता चांगले मित्र आहोत. सुरूवातीला मला अडचणी येत होत्या मात्र आता सर्व गोष्टी सकारात्मकरित्या चालू आहेत.
 
रूबी आता हळूहळू आपल्या कुटुंबीयांना भेटू लागली आहे. ती सांगते, की कोणत्याही कामासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते, हे मला घटस्फोटानं शिकवलं. माझ्या आनंदासाठी मी स्वतःच जबाबदार आहे. हा प्रवास अवघड होता. परंतु एका लांबच लांब अंधारानंतर एखाद्या सोनेरी किरणासारखा हा प्रवास आहे.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments