Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदींचं 'ते' वक्तव्य खूपच आक्रमक होतं - डोनाल्ड ट्रंप

Updated: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (10:55 IST)
 
दरम्यान भारत आणि पाकिस्तान एकत्र येतील आणि दोन्ही देशांसाठी चांगलं असेल असं काहीतरी घडेल असा आशावाद ट्रंप यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रश्नावर काही ना काही उत्तर असतं, यावरही उत्तर असेल, असं ट्रंप यांनी सांगितलं.
 
काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी तयार-ट्रंप यांचा पुनरुच्चार
भारत आणि पाकिस्तान यांना वाटत असेल तर काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करायला तयार आहे याचा पुनरुच्चार ट्रंप यांनी केला.
 
'मध्यस्थी करण्यासाठी सांगितलं तर मी तयार आहे. मध्यस्थी करण्यासाठी मी सक्षम आहे. काश्मीर प्रश्न क्लिष्ट आहे. काश्मीर प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. मी मध्यस्थी करावी यासाठी भारताची तयारी असायला हवी', असं ट्रंप म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "कट्टरतावादाचं निर्मूलन करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. इम्रान खान याप्रश्नी आगेकूच करू इच्छित आहेत. याप्रश्नी दुसरा कोणताही उतारा नाही. कर्ज आणि गरिबी अन्य दोन समस्या आहेत."
 
ट्रंपकडून इम्रान यांच्या अपेक्षा
"डोनाल्ड ट्रंप जगातल्या सगळ्यांत शक्तिशाली देशाचं नेतृत्व करतात. जगातल्या सगळ्यांत ताकदवान देशाचं उत्तरदायित्व असतं. आम्ही मध्यस्थीसाठी विचारणा केली. त्यावर दोन्ही देशांची तयारी आवश्यक आहे असं अमेरिकेने स्पष्ट केलं. दुर्देवाने भारत काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यास तयार नाही. एका मोठ्या संकटाची ही सुरुवात आहे," असं इम्रान खान म्हणाले.
 
"मला मनापासून वाटतं की काश्मीर प्रश्न आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. अमेरिका शक्तिशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेची भूमिका निर्णायक आहे. अमेरिकेने हा मुद्दा उचलून धरावा अशी आमची अपेक्षा आहे," असं ते पुढे बोलत होते.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोघेही संयुक्त राष्ट्रांच्या सभेत सहभाही होण्यासाठी अमेरिकेत आहेत.
 
संयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांसमोर काश्मीरचा प्रश्न मांडणार असल्याचं इम्रान यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
 
ट्रंप-इम्रान भेटीनंतर महमूद कुरेशी काय म्हणाले?
ट्रंप-इम्रान यांची भेट झाल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
 
ते म्हणाले, ही भेट पूर्वनियोजित होती, इम्रान यांनी प्रामुख्याने तीन मुद्दे मांडले.
 
"काश्मीर, अफगाणिस्तान आणि इराणप्रश्नी चर्चा झाली. काश्मीरप्रश्नी इम्रान यांनी मनमोकळेपणाने ट्रंप यांच्याशी चर्चा केली. काश्मीरच्या निमित्ताने मानवाधिकारांचं संकट उभं राहिलं आहे. 80 लाख नागरिक तुरुंगात आहेत. त्यांना मूलभूत हक्क नाकारले गेले आहेत. परिस्थिती बिघडली आहे," असं कुरेशी म्हणाले.
 
कुरेशींनी पुढे सांगितल,"भारत फक्त अमेरिकेचं ऐकू शकतो. अमेरिकेला भारताला हे सांगायला हवं. दोन्ही देशांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवायला हवा यावर त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. प्रकरणाला हिंसक वळण लागू नये यासाठी अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घ्यायला हवा. असं इम्रान यांनी स्पष्टपणे ट्रंप यांना हे सांगितलं."
 
दोन्ही नेत्यांमध्ये इराणच्या मुद्यावरही चर्चा झाली. पुरेशा विचाराअंती इराणवर कारवाई झाली तर त्याचे परिणाम भयंकर असतील असं इम्रान यांनी ट्रंप यांना सांगिल्याचं कुरेशी म्हणाले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments