Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"सारांश" || चिंतनीय, वाचनीय, लेखसंग्रह ||

Updated: सोमवार, 4 जुलै 2022 (14:56 IST)
 
श्री देशपांडे हे स्वतः शेतकरी आहेत म्हणजे या प्रश्नाची जाण ही त्यांना थेट आहे. यात सांगोवांगीचा भाग नाहीच.
 
ना. धों. महानोर, आरती प्रभू, अशोकजी परांजपे (चार पाच सहा) या लेखांमधून त्यांचा साहित्यिक वर्तुळातला वावर दिसून येतो. ना. धों. महानोर, आणि अशोकजी परांजपे, अशा थोर साहित्यिकांचा प्रत्यक्ष सहवास लेखकाला लाभला हे भाग्यच म्हणायचे. आरती प्रभू हे मराठी काव्याला पडलेले स्वप्न असेच म्हणावे लागेल. कितीतरी तरल अर्थवाही स्वप्नमग्न, गुढ आणि अथांग कविता त्यांनी लिहिल्या. त्यातल्या अनेक कविता मंगेशकरांचे संगीत लतादीदी आणि आशाताई यांचा स्वर असा अप्रतिम मिलाफ होऊन येतात आणि मनावर गारुड करतात. त्यातल्या वेदना मनाला चटका लावतात.सुन्न करतात. मनावरच्या खपल्या काढतात. काळजात ठसठसतात, कारण त्या आपल्या असतात. लेखक स्वतः कवी आणि कविमनाचे आहेत. त्यामुळे खानोलकरांनवर  लिहिताना ते अजून हळवे होतात. अनेक कलावंतांनी आरती प्रभू यांच्या विषयी काढलेले उद्गार वाचतांना आपणही नकळत हळवे होतो. तसेच अशोक जी परांजपे यांच्यावरचा लेख वाचताना होते. अशोकजी परांजपे हे लोककलेचे चालते बोलते विद्यापीठ होते.आय. एन.टी.(इंडियन नँशनल थिएटर) चा इतिहास हा त्यांच्या उल्लेखाशिवाय सुरू होत नाही आणि संपणार ही नाही. अनेक ग्रामीण कलावंत त्यांनी प्रकाशझोतात आणले. आदरणीय महानोर अनेकांचे प्रेरणास्थान. कवी, गीतकार, विचारवंत, प्रगतिशील शेतकरी, विधानपरिषद सदस्य, म्हणून राजकारणी, आणि समाजकारणी, असे उत्तुंग व्यक्तिमत्व लेखकाने प्रत्यक्ष भेटून त्यांचे हे पैलू पाहिले आहे. अभ्यासले आहे.
 
आपण जरी लेखक कवी पत्रकार कलावंत अधिकारी वगैरे कुणीही असलो तरी समाजाचाच एक भाग असतो. सामान्य ग्राहक असतो. ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क कोणते आहेत ? आपण कुठल्या बाबींचे भान बाळगले पाहिजे ? याची माहिती लेखक देतो. आणि सुजाण ग्राहक होण्याची प्रेरणा ही देतो. समाजात अनेक अभियाने होत असतात .राबविण्यात येतात. त्यांचे यशापयश सर्वस्वी जनतेच्या लोकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागा वरच अवलंबून असते. प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध हवेत ही रास्त मागणी सामाजिक जाणिवेतून आलेली दिसते, याच जाणिवेतून ज्येष्ठांना सन्मानाची संध्याकाळ मिळाली पाहिजे हा विचार मांडला जातो. मोबाईलच्या अतिवापरा मुळे संवाद हरवून गेला आहे. ही आता फक्त लेखकाचीच नव्हे तर प्रत्येक सुजाण नागरिकांची खंत आहे. अर्थात हा तंत्रज्ञानाचा नाही तर वापरकर्त्यांचा  पराभव आहे.
आजकाल अनेक दिवस डेज साजरे होत असतात ही केवळ औपचारिकता आहे असे लेखकाला जाणवते. त्यातला फोलपणा त्यांना अस्वस्थ करतो. काय केले म्हणजे ते दिवस सार्थकी लागतील यावर आपले मत मांडतात.
 
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. जबाबदारीचे भान ठेवून हे शस्त्र वापरले गेले पाहिजे. त्याचे अर्थशास्त्र नीति पूर्वक  सांभाळे पाहिजे. या प्रकारच्या भावना दर्पण दिनानिमित्त ते व्यक्त करतात.
 
साहित्य संमेलनामध्ये वृत्त माध्यमातून होणाऱ्या मनोराजनीकरणाचा आढावा घेताना अनेक मान्यवर लेखक पत्रकारांच्या मताची चर्चा केली गेली आहे. त्यात समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न दिसतो. किराणा दुकानातून वाइनला विक्रीला परवानगी देणाऱ्या शासकीय निर्णयावर साधक-बाधक विचार लेखक मांडतात तेव्हा त्यांच्या दूरगामी परिणामांची जाणीव त्यांना झालेली दिसते.
 
चांगला लेखक हा आधी चांगला वाचक असावा लागतो. तो ग्रंथप्रेमी असेल तरच आपले मनोगत समर्थपणे मांडू शकतो. कारण मुद्रण संस्कार होण्याआधी त्याच्यावर वाचन संस्कार झालेले असतात. प्रस्तुत लेखक ही कसोटी यशस्वीपणे पार करून आले आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येईल असे दोन लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. ग्रंथांली वाचक चळवळीत सक्रिय सहभाग असल्यामुळे वाचनालये साहित्य संवादाची केंद्रे व्हावीत असा आग्रह धरू शकतात. पुस्तकांच्या सहवासातले ते दिवस त्यांना आठवत राहतात. त्यांना ते क्षण रुपेरी वाटतात. ही सगळी पुस्तके सगळे ग्रंथ अर्थातच मराठीतच आहेत. आणि म्हणून दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात या शासकीय निर्णयाचा आढावा लेखक सहज घेउन जातो. मराठीचा सन्मान झाला पाहिजे असा आग्रह धरू शकतो.
 
लेखकाची भाषेवरची पकड सुंदर आहे. योग्य आणि अचूक शब्दासाठी ते अडत नाहीत. ओघवती भाषा परिणामकारक शब्दकळा वाचकाला गुंतवून ठेवते. मग तो लेख कवितेवरचा असो की पर्यावरणाचा असो किंवा बँकेवरचा असो, खोलवर अभ्यासामुळे असा परिणाम साधता येतो.
 
संग्रहाचे मुखपृष्ठ त्याला योग्य असेच आहे .प्रत्येकाने हा लेख संग्रह जरूर वाचावा असे आग्रहाने सांगावेसे वाटते. लेखनाचे स्वरूप जरी प्रासंगिक असले तरी विषय मात्र सार्वजनिक, सार्वकालिक, आहेत. लेखकाची लेखणी बहुप्रसवा राहावी, विविध विषय त्यांनी हाताळावेत, समाजातील दंभावर प्रहार करावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !
 
"सारांश"【लेख संग्रह】
लेखक-दिलीप देशपांडे
शॉपिज़न प्रकाशन
मुल्य.१८४/-
पुस्तकासाठी संपर्क
मोबा- ९९२६५७६४५५/८९९९५६६९१७
 
-प्रसाद दत्त पाठक
【डोंबिवली 】
मोबा.९८१९११२८०५

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख