Marathi Biodata Maker

राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त

बुधवार, 20 जानेवारी 2021 (08:31 IST)
राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या १८ लाख ९४ हजार ८३९ वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्क्यांवर आहे.
 
याशिवाय, राज्यात मंगळवारी २ हजार २९४ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ९४ हजार ९७७ वर पोहचली आहे. याशिवाय, ५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने, आतापर्यंत राज्यात ५० हजार ५२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४८ हजार ४०६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत राज्यभरात १,३८,९५,२७७ नमुन्यांची तपासणी झाली. यापैकी १९ लाख ९४ हजार ९७७ (१४.३६टक्के) नमूने पॉझिटव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ५८ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, १हजार ९९६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: "देणगी द्या नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

दिल्लीतील साकेतमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरु

शार्दुल ठाकूर मुंबईच्या टी२० लीगची धुरा सांभाळणार, संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली

महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार

"देणगी द्या नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुढील लेख