Marathi Biodata Maker

राज्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ, तर 285 मृत्युमुखी

बुधवार, 2 जून 2021 (22:59 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 15169 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह, राज्यात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 285 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या घटनेच्या तुलनेत जवळपास दुप्पट लोक बरे झाले आहेत ही दिलासाची बाब आहे. मंगळवारच्या तुलनेत राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये किंचित वाढ झाली आहे.
 
आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात कोरोनामुळे 29,270 लोक बरे झाले आहेत. यासह राज्यातील कोरोना विषाणूचा  रिकव्हरी दर 94.54 टक्क्यांवर पोहोचला आहे.सध्या राज्यात 16,87643 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7418लोक संस्थेच्या अंतर्गत वेगळे ठेवण्यात आले आहेत.
मंगळवारी राज्यात कोरोना विषाणूचे 14,123 नवीन रुग्ण आढळले तर 477 लोकांचा बळी गेला.
त्याचवेळी मुंबई हायकोर्टाने बुधवारी म्हटले आहे की, केंद्राने महाराष्ट्रात पाठविलेले कोणतेही व्हेंटिलेटर सदोष असतील तर ते बदलले जावेत. कोविड -19 च्या रूग्णांवर अशे व्हेंटिलेटर वापरण्यास परवानगी देऊ शकत नाही, असे कोर्टाने आवर्जून सांगितले. 
कोविड -19 साथीच्या रोगासंदर्भात विविध विषयांवर दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.व्ही. गुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबद्वार यांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारतर्फे बाजू मांडत फिर्यादी डी.आर. काळे यांनी कोर्टाला सांगितले होते की, मराठवाड्यातील रुग्णालयांना केंद्राकडून पुरविण्यात येणाऱ्या  100 हून अधिक व्हेंटिलेटर सदोष असून त्यामुळे ते वापरता येणार नाहीत. 
 
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: "देणगी द्या नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

दिल्लीतील साकेतमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरु

शार्दुल ठाकूर मुंबईच्या टी२० लीगची धुरा सांभाळणार, संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली

महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार

"देणगी द्या नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुढील लेख
Show comments