गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (19:56 IST)

12वीच्या बोर्ड परीक्षांचा निर्णय एक-दोन दिवसात- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

सीबीएसई बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या सुमारे 14 लाख विद्यार्थी राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी सांगितले की, बारावी राज्य बोर्डाच्या परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या विषयावर ते बैठक घेतील आणि एका -दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे सुरक्षा आणि आरोग्य हे सरकारचे प्राधान्य आहे. 
काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या की कोविड -19साथीची परिस्थिती लक्षात घेता "परीक्षा नसलेल्या मार्गाचा" पर्याय शोधले पाहिजे.
 
दहावीची परीक्षा रद्द करून मूल्यांकन नीती जारी करण्यात आली आहे - 
या अंतर्गत मूल्यांकनच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात येतील. यंदाचे गृहपाठ, तोंडी कामगिरी व नववी वर्ग परीक्षाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येईल, 
 
वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की दहावीचा निकाल जून अखेरीस जाहीर होईल. प्रत्येक विषयात 100 गुण आहेत जे अंतर्गत मूल्यांकनानुसार ठरविले जातील. दहावीच्या परीक्षेसाठी 30 गुण, तोंडी परीक्षेसाठी 20 गुण आणि 9 वी गुणांसाठी 50 गुण निश्चित केले आहेत.
महाराष्ट्रात 12 वीची परीक्षा 23 एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार होती परंतु वाढत्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या.