Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आशिया चषकही रद्द होणार : टीम इंडियाला मोठा धक्का बसणार

Updated: शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:59 IST)
 
कोरोनामुळे जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द अथवा स्थगित केल्या आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, आफ्रिका आदी सर्व देशांतील द्विपक्षीय मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग असलेली आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत अन्य देशातील खेळाडू खेळत असल्यामुळे त्याचा फटका त्यांनाही बसेल. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल हे माहीत नाही. 
 
येत्या काही महिन्यात होणारी आशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट काउंसिलची या स्पर्धा संदर्भातील बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. एसीसीकडून आशिया कपचे आयोजन केले जाते. नियोजित वेळेनुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार होती. पण सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा होईल असे वाटत नाही.
 
पुढील आशिया कप स्पर्धा कधी आणि कुठे घेण्यासंदर्भात एसीसीची बैठक हणोर होती, पण ही बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या वर्षी आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण बीसीसीआयने भारतीयक्रिकेटपटू कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात खेळणार नाहीत अशी भूमिका घेतली होती.
 
भारताच्या या भूमिकावर पीसीबी आणि एसीसीला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एसीसीकडे दोनच पर्याय शिल्लक राहतात एक म्हणजे भारताशिवाय ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये घ्यायची किंवा भारतासह स्पर्धेचे ठिकाण बदलून दुबईत त्याचे आयोजन करायचे. या संदर्भातच एसीसीची बैठक 29 मार्च रोजी होणार होती. पण ही बैठक कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. या बैठकीच्या आधी सौरव गांगुली यांनी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळू शकतो. पण स्पर्धा अन्य  ठिकाणी झाली पाहिजे. पाकिस्तानसाठी ही बाब मोठा झटका देणारी आहे. पाक बोर्डाला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करायचे असल्याने त्यांना आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये व्हावी अशी इच्छा आहे.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

LIVE: वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

सिद्धिविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस, ४६ कर्मचारी निलंबित , ९ जणांना अटक

कुर्ल्यातून अपहरण झालेला ६ महिन्यांचा मुलगा ४ तासांत सापडला, आरोपीला अटक

विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेस मध्ये येण्याचे ऑफर दिले

पुढील लेख
Show comments