Dharma Sangrah

कोरोनाचा कितपत प्रसार झाला ? वाचा सर्व्हे काय म्हणतो

मंगळवार, 16 जून 2020 (08:31 IST)
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर ) यांच्यावतीने मे २०२० मध्ये देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो-सर्व्हे करण्यात आला.  त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी  राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली असून या प्रकारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे.
 
राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. परंतू याचा दुसरा अर्थ राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने अद्याप प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसून कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता,  नेहमी स्पर्श होणा-या पृष्ठभागाचे स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई आणि लव्हलिना यांना मोठी जबाबदारी दिली

६ बंडखोर खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, सभापती बिर्ला यांनी विलीनीकरणाला मंजुरी दिली

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर

श्रीलंका दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघ जाहीर, संघातून ८ खेळाडूंना वगळले

अण्णा हजारे यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आणि सरकारला कडक इशारा दिला

पुढील लेख
Show comments