Dharma Sangrah

दिवाळीला सुंदर दिसण्यासाठी घरगुती फेसपॅक

गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (14:07 IST)
सणासुदी जवळ येतातच कामाचा व्याप वाढून जातो. धावपळ, दगदग, घराची स्वच्छतेपासून सजावटी आणि खाण्या -पिण्याच्या बाबतीत स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अश्या मध्ये जेव्हा कुटुंबियांसह आणि मित्रांसह वेळ घालवताना फोटो काढण्याच्या वेळी आपल्या चेहऱ्यावरील तेज नाहीसा होतो. पण घरात बसून देखील चेहऱ्याचा तजेल पणा सहजपणे मिळवू शकतो. या साठी काही घरगुती फेसपॅकची गरज असणार. चला तर मग जाणून घेऊया की या फेसपॅक मुळे आपली त्वचा कशी चकाकेल. 
 
पार्लरच्या महागड्या फॅशियल आणि क्लीनअपने मिळणारा तजेलपणा देखील या घरगुती फेसपॅक ने मिळवू शकता. या साठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार.
 
* 1 चमचा नारळाच्या दुधासह 1/4 चमचा हळद मिसळा. या पॅकने आपल्या त्वचेची मालीश करा. आणि याला 15 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने याला धुऊन घ्या. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद ही सर्वोत्तम मानली जाते. चमकती त्वचा मिळविण्यासाठी, टॅन काढण्यासाठी आणि मुरुमांशी लढण्यासाठी या पॅकचा वापर करावा. हे अँटी ऑक्सिडंटने भरपूर असतं. जे छिद्र स्वच्छ करून नैसर्गिक चमक देतं.
 
* दूध किंवा पाण्यात बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी याची मऊ अशी पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. व्हिटॅमिन इ आणि लॅक्टिक ऍसिडमध्ये भिजत टाकल्यानं आपल्या त्वचेच्या जटिलतेत सुधारणा होईल आणि त्वचा मऊ होईल त्याच सह चकाकी येते. त्वरितच चमक मिळविण्यासाठी हे एक सोपे पॅक आहे.
 
* सर्वप्रथम उडदाची डाळ वाटून त्याची भुकटी बनवा. आता या मध्ये चिमूटभर हळद आणि गरजेपुरतं पाणी घाला. तयार झालेल्या पेस्टला चेहऱ्यावर लावून काही काळ वाळू द्या आणि नंतर स्क्रब करत चेहऱ्याला हळुवार हाताने मालीश करा.

सर्व पहा

श्री नित्यानंद राया आरती, जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

आज विवस्वत सप्तमी; सूर्यपुत्र वैवस्वत मनूची ही पौराणिक कथा नक्की वाचा

आज श्री ताप्ती जयंती, महत्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments