suvichar

गजानन महाराजांच्या तीर्थामुळे वाचले भक्ताचे प्राण

शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (17:00 IST)
गजानन महाराजांना बंकटलाल फार मान देत असे. एके दिवशी महाराजांना घरी नेऊन बंकटलालने त्यांची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. महाराजांना कशाची आसक्ती नव्हती. महाराज ''गण गण गणात बोते'' असे भजन टिचक्यांच्या तालावर तासंतास म्हणत असे.
 
एकदा जानराव देशमुख नावाचे गृहस्थ फार आजारी पडले. पुष्कळ डॉक्टर, मोठमोठले वैद्य झाले. कोणाच्या औषधाने गुण येईना. त्यांचा नातेवाईकांच्या मनात विचार आला की गजानन महाराजांचे तीर्थ आणावे. तेव्हा त्याच्या जवळची मंडळी बंकटलाल यांच्याकडे जाऊन महाराजांचे तीर्थ मागू लागली. तेव्हा बंकटलाल यांनी म्हटले की हे काम माझे वडील करु शकता.
 
तेव्हा बंकटलालच्या वडिलांनी एका भांड्यात पाणी घेतले आणि गजानन महाराजांच्या पायाला लावले. ''हे तीर्थ म्हणून देऊ का ?' 'असे महाराजांना विचारले. महाराजांनी मानेनेच होकार दिला. ते तीर्थ घेऊन त्यांचे नातेवाईक तेथून निघाले. 
 
घरी गेल्यावर जानराव देशमुखांना त्याने ते तीर्थ थोडे-थोडे पाजण्यास सुरुवात केली आणि सर्व औषधे बंद केली. तीर्थ चालू ठेवले. आश्चर्य म्हणजे थोड्याच दिवसात जानराव देशमुखांची तब्बेत सुधारली. ते गजानन महाराजांच्या पाय पडले. त्यांनी सर्व लोकांना स्वतःच्या खर्चाने जेवण घातले.

सर्व पहा

चाणक्य नीती: यशस्वी लोकांमध्ये आढळणारे ४ गुण, ते अंगीकारून तुम्हीही तुमचे जीवन बदलू शकता

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

सत्राणें उड्डाणे हुंकार वदनी मारूती आरती मराठीत

मंगळवारी चुकूनही करू नका ही ७ कामे; नाहीतर हनुमानजी होऊ शकतात नाराज!

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments