Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का पडतात श्री जगन्नाथ भगवान प्रत्येक वर्षी आजारी?.....

Updated: गुरूवार, 4 जुलै 2019 (12:38 IST)
 
कोणी इतकी सेवा नाही करू शकणार जितकी जगन्नाथ भगवान भक्त माधव दास जीं ची करीत होते ।
 
जेव्हा माधवदासजी शुद्धीत आले, तेव्हा त्यांनी तुरंत ओळखलं की हे तर माझे प्रभू आहेत!
एक दिवस श्री माधवदासजी ने विचारले भगवंताला की....
“प्रभू आपण तर त्रिभुवनाचे स्वामी आहात, आपण माझी  सेवा करत आहात, आपण ठरवलं तर माझा रोग तर तुम्ही सहज दूर करू शकत होतात, रोग दूर केला असता तर हे सगळं करण्याची गरजच नव्हती". 
 
भगवंत् म्हणाले.. हे बघ माधव! माझ्या नी भक्तांचे कष्ट नाही सहन होत, ह्या कारणा ने तुझी सेवा मी स्वयं केली। जे प्रारब्द्ध आहे ते तर भोगण्याचे आहेच। ते कोणीही टाळू शकत नाही.
 
जर ते भोगले नाही या जन्मात तर परत भोगण्यासाठी परत तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल आणि माझी इच्छा नाही की माझा भक्ताला या प्रारब्द्धा मुळे पुढचा जन्म परत घ्यावा लागावा.
 
या साठी मी तुझी सेवा केली, परंतु जर तू म्हणत असशील तर, भक्ताचे म्हणणं देखील मी टाळू शकत नाही.  
 
आता तुझ्या प्रारब्द्धामधे 15 दिवसाचा रोग बाकी आहे, त्या करता 15 दिवसाचा रोग तू मला दे.
15 दिवस तो रोग जगन्नाथजींनी माधवदास कडूनं घेतला.
 
आज ही या कारणामुळे जगन्नाथ भगवान आजारी पडतात .....
 
ही झाली त्या वेळेची कहाणी. परंतु भक्त वत्सलता तर पहा आज ही वर्षात एकदा जगन्नाथ भगवानाला स्नान करवले जाते (ज्याला स्नान यात्रा म्हणतात)
 
स्नान यात्रा झाल्या नंतर प्रत्येक वर्षी 15 दिवस आजही जगन्नाथ भगवान आजारी पडतात ।
 
15 दिवस मंदिर बंद केले जाते. कधीच जगन्नाथ भगवान चे स्वयंपाक घर बंद नसते परंतु या 15 दिवसा साठी ते बंद ठेवले जाते. 
 
भगवंताला 56 भोगाचा नैवेद्य दाखवला जात नाही. (कारण आजाराचे पथ्य) 
 
प्रभूला काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. ........
 
15 दिवस जगन्नाथ धाम मंदिरात भगवानच्या आजारपणाची चिकित्सा करण्यास रोज वैद्य येतात.
 
काढ़्या व्यतिरिक्त 
फळांचा रस ही दिला जातो. रोज शीतल लेप लावला जातो. आजारपणात रोज रात्री झोपण्याआधी गोड  दूध अर्पित केले जाते.
 
भगवान जगन्नाथ आजारी झाले आहेत आणि आता 15दिवसा पर्यंत आराम करतील। आराम साठी 15 दिवसापर्यंत मंदिराचे पट बंद राहतात आणि त्यांची सेवा केली जाते। जेणेकरून ते लवकर ठीक व्हावे.
 
ज्या दिवशी ते पूर्णं ठीक होतात त्या दिवशी जगन्नाथ यात्रा निघते ज्यासाठी जगभरातून दर्शन हेतू असंख्य भक्त पुरीला येतात. 
 
स्वतः त्रास सहन करून आपल्या भक्ताचे जीवन सुखमयी करणारा तो एकमेव भगवंतच असू शकतो ।।
 
जय जगन्नाथ जी

सर्व पहा

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments